शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सरकारला देशात समान नागरी कायदा आणण्याची इच्छा आहे का? - सर्वोच्च न्यायालय

By admin | Published: October 14, 2015 2:35 PM

सरकारला देशात समान नागरी कायदा आणण्याची इच्छा आहे का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - सरकारला देशात समान नागरी कायदा आणण्याची इच्छा आहे का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. धार्मिक परंपरांचे नियमन करणाऱ्या वैयक्तिक कायद्यांमुळे गोंधळ निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधून घेत न्यायालयाने ही विचारणा केली. याप्रकरणी सरकारचे मत जाणून घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरलना दिले असून तीन आठवड्यानंतर याप्रकरणाची सुनावणी घेण्यात येणार आहे. 
कायद्यापुढे सर्व नागरिक समान असावेत आणि सर्व धर्माचे नियमन एकाच मापदंडानुसार व्हावे, असे असताना समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सरकारचे काय मत आहे, तुम्ही तसा कायदा करून तो अमलात का आणत नाही असा सवाल न्या. विक्रमजित सिंग व न्या. शिवा कीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने सरकारला विचारला. 
घटस्फोट मिळण्यासाठी इतर धर्मातील नागरिकांना एक वर्ष वेगळ रहावं लागत असताना ख्रिश्चन धर्मीयांना घटस्फोटापूर्वी किमान दोन वर्षे वेगळे रहावे लागते. या कायद्याच्या तरतुदीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायलयाने सरकारकडे ही विचारणा केली. 
आम्ही घटस्फोट कायद्याच्या कलम १०अ(१) मध्ये दुरुस्ती करण्याचे ठरवले असून विधी मंत्रालयाने तसा प्रस्तावही तयार केल्याची माहिती यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाला देण्यात आली होती. ख्रिस्ती धर्मीय नागरिक ज्या कलमान्वये १०अ(१) घटस्फोटासाठी अर्ज करतात, त्यानुसार घटस्फोट घेण्यापूर्वी त्या जोडप्याला दोन वर्ष वेगळे राहिल्यानंतरच परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज करता येतो.  पण विशेष विवाह कायदा, हिंदू विवाह कायदा व पारसी विवाह व घटस्फोट कायदा यांमध्ये हा कालावधी फक्त एक वर्षाचा आहे.
शेवटच्या सुनावणीला तीन महिने उलटून गेल्यानंतरही यासदंर्भात कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी नोंदवत हे का होऊ शकत नाही, असा सवाल सरकारला विचारला. यासाठी थोडा कालावधी देण्यात यावा अशी मागणी सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली. मात्र सरकारी वकिलांच्या उत्तरावर असामाधानी असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरलाना सरकारचे मत जाणून घेण्याचे निर्देश दिले.