शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का? ईडी चौकशीवरुन भाजपचा अरविंद केजरीवाल यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:35 IST

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीने समन्स पाठवून आज चौकशीसाठी बोलविले होते, केजरीवाल यांनी ईडीच्या नोटीसीवर उत्तर दिले आहे. यामध्ये ईडीने ही नोटीस त्वरीत मागे घ्यावी, असे म्हटले आहे. तसेच केजरीवाल ईडीच्या चौकशीला जाणार नसून ते मध्य प्रदेशच्या सिंगरौलीमध्ये निवडणूक प्रचाराला जाणार आहेत, यावरुन आता भाजपने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निशाणा साधला आहे. 

केजरीवाल ईडी चौकशीला न जाता मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार; आपला अटकेची भीती

भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी ईडीसमोर हजर न झाल्याचा खरपूस समाचार घेतला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोणावर विश्वास नाही का? त्यांचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का?, असा सवाल त्यांनी केला.

संबित पात्रा म्हणाले, अरविंद केजरीवाल पळून गेल्याचे तुम्ही टीव्हीवरून पाहत असाल. अरविंद केजरीवाल ईडीच्या समन्सपासून पळ काढत आहेत, सत्याला सामोरे जाण्यापासून ते पळत आहेत. तपासापासून पळ काढणे म्हणजे माझ्याकडून चूक झाली हे मान्य करण्यासारखे आहे. ईडीसमोर हजर न होणे म्हणजे एक प्रकारे भीती दाखवणे, होय, माझ्याकडून चूक झाल्याचे मान्य करणे.

दिल्ली मद्य घोटाळ्याला अरविंद केजरीवाल थेट जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. संबित पात्रा म्हणाले, केजरीवाल हे या घोटाळ्याचे किंगपीन आहेत, होय, मद्य घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचे केजरीवाल यांनी मान्य केले आहे. या धोरणात झालेल्या सर्रास भ्रष्टाचारात सहभाग आहे. नाहीतर त्यांना घाबरायची काय गरज होती?

सुप्रीम कोर्टाचा उल्लेख करत भाजपने आप नेत्यांवरही निशाणा साधला. पात्रा म्हणाले, अवघ्या ३ दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांचा जामीन फेटाळला आणि दारू घोटाळा अनेक हजार कोटींचा असल्याचे सांगितले. पूर्वी केजरीवाल शीला दीक्षित यांनी भ्रष्टाचार केला, रॉबर्ट वाड्रा यांनी भ्रष्टाचार केला, लालूप्रसाद यादव यांनी भ्रष्टाचार केला असे रोज म्हणायचे पण आज त्यांनी या सर्वांशी युती केली आहे.

आज भारताची तपास यंत्रणा तुम्हाला समन्स बजावत असताना तुम्ही पळून जात आहात. तुम्हाला भ्रष्टाचाराचे मूळ म्हटले आहे. तुम्ही कायद्याच्या वर आहात का? असंही संबित पात्रा म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाSambit Patraसंबित पात्रा