शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

"यांना माफ करायला नको, तर..."; रणवीर अलाहाबादिया, समय रैनाबद्दल धीरेंद्र शास्त्रीचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:28 IST

Ranveer Allahbadia Samay Raina: समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटंट शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानावर धीरेंद्र शास्त्री यांनी संताप व्यक्त केला. 

Dhirendra Shastri Ranveer Allahbadia Samay Raina: युट्यूबवरील इंडियाज गॉट लेटंट शोमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांवर बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या व्हिडीओवर संताप व्यक्त करत धीरेंद्र शास्त्री म्हणाले, 'रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांनी जे केले आहे, ते खूपच निंदाजनक आहे. इतकं घाणेरडं आहे की, बोलणंही अवघड आहे. अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे. त्यांना माफ करायला नको, तर मनातून आणि ह्रदयातून काढून टाकलं पाहिजे', अशा शब्दात त्यांनी सुनावले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'देशाच्या सनातन संस्कृतीशी जे खेळ करत आहेत, निश्चितपणे असे लोक निर्दयी आहेत. सरकार अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करत आहेत. आम्ही लोकांना आवाहन करतो की, वेट अॅण्ड वॉच. व्यक्ती कसा आहे, हे आधी जाणून घ्या. त्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवा. या दोघांनी खूप घाणेरड्या गोष्टी बोलल्या आहेत. ज्या ऐकणंही कठीण आहे. अशा लोकांना माफ करू नका, तर मनातून काढून टाका', असे आवाहन धीरेंद्र शास्त्रींनी लोकांना केले. 

समय रैनाचे दोन शो रद्द

रणवीर अलाहाबादियाच्या शोमुळे समय रैनाही वादात सापडला आहे. त्याचे दोन शो गुजरातमध्ये होणार होते. ते रद्द करण्यात आले आहेत. 

समय रैनाचा अहमदाबाद आणि सूरतमध्ये कार्यक्रम होणार होता. वाद निर्माण झाल्यामुळे दोन्ही शो रद्द करण्यात आले आहेत. १७ मार्च आणि २७ एप्रिल रोजी हे शो होणार होते. 

बीयर बायसेप्स नावाने प्रसिद्ध असलेल्या रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. रणवीरने माफी मागितली असली, तरी त्याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या विधानाचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. 

टॅग्स :Ranveer Allahbadiaरणवीर अलाहाबादियाPoliceपोलिसYouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल