शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

सरकार अस्थिर होऊ देऊ नका; संबित पात्रांनी केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 20:31 IST

देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे असे नमूद करून पात्र म्हणाले, की अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीच देशभर साधनसुविधांचे जाळे विणले जात आहे.

पणजी : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), तिहेरी तलाक, काश्मिरचे 370 कलम असे अनेक प्रश्न गेली सत्तर वर्षे सुटले नव्हते पण मोदी सरकारने ते सोडवले. लोकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी या निर्णयांसोबत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ठामपणे रहावे. विरोधक देशाला व सरकारलाही अस्थिर करू पाहत आहेत पण तुम्ही सरकार अस्थिर होऊ देऊ नका असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी येथे केले.

गोव्यातील काही चार्टड अकाऊण्टंट्स, सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी पात्र यांनी पणजीत संवाद साधला. सध्याचा भारत हा नवा भारत आहे व त्याचदृष्टीकोनातून मोदी सरकारने देशाला चांगला अर्थसंकल्प कसा दिला हे स्पष्ट करण्यासाठी संबित पात्रा गोव्यात आले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, विनय तेंडुलकर आदी यावेळी व्यासपीठावर होते.

देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे असे नमूद करून संबित पात्रा म्हणाले, की अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीच देशभर साधनसुविधांचे जाळे विणले जात आहे. मोदी चांगले काम करत आहेत पण देशातील काही विरोधी शक्ती मोदींना विरोध करता करता देशाला विरोध करू लागल्या आहेत. स्व. राजीव गांधी यांच्या सरकारला काही शक्तींनी शहाबानो प्रकरणी ब्लॅकमेल करून निर्णय फिरवायला भाग पाडले होते. सीसीएप्रश्नीही तशाच प्रकारे या शक्ती मोदी सरकारला ब्लॅकमेल करू पाहत आहेत. त्या शक्ती मोदी सरकारने माघार घ्यावी म्हणून वातावरण दुषित करत आहेत. अशावेळी तुम्ही सर्वानी एखाद्या मोठ्या अभेद्य खडकाप्रमाणो मोदी सरकारच्या मागे रहावे.

देशात आणि गोव्यातही भाजप सरकार अधिकारावर आल्यानंतरच साधनसुविधा निर्माणाच्या कामांना वेग आला. मोदी दुसऱ्यांदा प्रचंड जागा प्राप्त करून सत्तेवर आले. मोदी सरकारला जागा सहानुभूतीमुळे मिळाल्या नाही तर त्यांच्यात आपली स्वप्ने साकार करणारे नेतृत्व देशाने पाहिले व त्यांच्या नेतृत्वाला मते दिली. काश्मिरमध्ये 370 कलम हटविले गेल्यामुळे आज काश्मिरात शांतता आहे. 73 टक्के सैनिकांचे प्राण त्यामुळे वाचले आहेत.

70 वर्षे जे प्रश्न सुटले नाहीत, ते प्रश्न सोडविण्यास मोदी यांनी प्राधान्य दिले. तसे प्राधान्य दिले नसते तर त्यांना निवडणुकीवेळी मिळालेल्या प्रचंड बहुमताचा व जनमताचा तो विश्वासघात ठरला असता, असे संबित पात्रा म्हणाले. देशाला उर्जा असलेला तपस्वी पंतप्रधान लाभला आहे. त्यामुळेच अमेरिका देखील भारताचा सन्मान करते. ट्रम्प यांनी मोठी परिपक्वता दाखवली व त्यांनी सीएएवर विरोधी भाष्य करणो टाळले, असेही संबित पात्रा यांनी नमूद केले.

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राBJPभाजपाgoaगोवाcongressकाँग्रेसPramod Sawantप्रमोद सावंत