शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

‘डबल इंजिन’ सरकारने जिंकला जनतेचा विश्वास; लोकसभा अन् राष्ट्रपती निवडणुकीचा मार्ग झाला सोपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:57 IST

योगींनी बदलले राजकारण. योगींनी एकीकडे लोकांच्या मनात आपला दमदार विश्वास निर्माण केला व दुसरीकडे सरकारी योजना अशा प्रकारे लागू केल्या की, लोकांना थेट फायदा झाला.

- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळवित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपने आणखी एक इतिहास रचला आहे. देशातील सर्वांत मोठ्या राज्यातील जनतेने सुमारे ३७ वर्षांनंतर एखाद्या पक्षाला सत्तेत पुनरागमनाची संधी देऊन बहुमत दिले आहे. यामुळे देशभरात मुख्यमंत्री योगी यांची प्रतिमा उंचावली आहे.

या विजयाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. हा मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याचे मानले जात आहे. योगींच्या रूपाने भाजपच्या भविष्याची झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मार्ग सोपा झाल्याचाही तर्क आहे. याबरोबरच राष्ट्रपती निवडणुकीतही भाजपच्या या विजयाची मदत होणार आहे.

जनतेच्या विश्वासाचा विजयशाहनवाज हुसेन यांनी सांगितले की, सब का साथ सबका विकास व सबका विश्वास, ही केवळ घोषणा नाही, तर वस्तुस्थिती आहे. मोदी हे विश्वासाचे दुसरे नाव झाले आहे. या निकालाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही मोठ्या बहुमताचे सरकार बनवू, याचाही विश्वास दिला आहे.

‘गँगस्टर’वर घातला घावमार्च २०१७ मध्ये सत्तेत आल्यानंतर योगींनी यूपीचे वातावरण बदलण्याचे काम केले. पहिला घाव गुन्हेगार व माफियांवर घातला. गुन्हेगारांनी एक तर गुन्हे सोडावेत किंवा यूपी सोडावे, असे आवाहनच त्यांनी केले. राज्यात गँगस्टर ॲक्टनुसार अब्जावधी रुपयांची अवैध संपत्ती जप्त केली. २०१७ नंतर योगी सरकारने बारा हजारांपेक्षा जास्त वाँटेड गुन्हेगारांना अटक केल्याचा दावा केला. ६८० जणांविरुद्ध एनएसए लावला. गुन्हेगारांच्याविरोधात १५ हजार गुन्हे दाखल करून १,९०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. मुख्तार अन्सारी व अतिक अहमदसारख्या बाहुबलींविरोधात कारवाई करून नवीन धडा घालून दिला.

हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी यांच्यावरील जनतेच्या विश्वासाचा आहे. जाती व धर्माचा विचार न करता समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या विकासाचे धोरण अवलंबल्यामुळेच हे शक्य झाले.- मुख्तार अब्बास नकवी,केंद्रीय मंत्री 

योगींनी एकीकडे लोकांच्या मनात आपला दमदार विश्वास निर्माण केला व दुसरीकडे सरकारी योजना अशा प्रकारे लागू केल्या की, लोकांना थेट फायदा झाला. यूपीत ५.७७ कोटींपेक्षा अधिक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत २.८२ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाले.१.६७ कोटी गरीब महिलांना उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर दिले. राज्यात १.१६ कोटी लोकांना मागीलवर्षी मनरेगा योजनेत काम मिळाले. स्वच्छ भारत अभियानात मागील आठ वर्षांत राज्यात २.२२ कोटी शौचालये उभारण्यात आली. पीएम आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत यूपीमध्ये गरीब कुटुंबांसाठी १२.१४ लाख घरे तयार करण्यात आली. याशिवाय केंद्र व राज्य सरकारांच्या अनेक योजनांद्वारे पैसा थेट लोकांच्या खिशात पोहोचविला. यामुळे महागाई व बेरोजगारीची तीव्रता कमी झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२