शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

डोकलाम वाद : चीन लपवत आहे 1890 कराराचं सत्य ?

By admin | Published: July 08, 2017 9:03 AM

डोकलाम विवादावर चीनकडून सत्य लपवण्यात येत असल्याचे वृत्त समोर येत आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - डोकलाम विवादावर चीनकडून सत्य लपवण्यात येत असल्याचे वृत्त समोर येत आहे. ""सिक्कीम-तिबेट 1890 करार ""चे दस्ताऐवज दाखवत चीननं डोकलामसंदर्भात असा दावा आहे की, तिबेट सरकारनं यावर स्वाक्षरी केली नव्हती. 16 जूनपासून चिनी सैनिकांनी डोकलाममध्ये एका रस्ते बांधणीचं काम सुरू केले होते, ज्यानंतर या परिसरात भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. तसे पाहायला गेले तर हा भाग भुतानमध्येही मोडतो.  
 
1890 साली झालेला करार वगळता चीननं 1960पर्यंत भुतान-तिबेट आणि सिक्कीम-तिबेट सीमांसंदर्भात कोणत्याही करारावर सहमती दर्शवली नव्हती.  नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार,  विश्लेषकांचं असे म्हणणे आहे की, डोकलामवर स्वतःचा दावा सांगताना चीननं अशा कोणत्याही दस्ताऐवजांचा उल्लेख केलेला नाही, हे आणखी एक सत्य आहे. तिबेट प्रकरणी इतिहासकार क्लॉड आर्पी यांनी सांगितले की, तिबेट सरकारनं 1890मध्ये झालेला करार स्वीकारण्यास नकार दर्शवला होता कारण याबाबतीच माहिती देण्यात आलेली नव्हती किंवा कराराचा हिस्सा बनवण्यात आला नव्हता. पुढे त्यांनी असेही सांगितले की, करारामुळे ब्रिटीश आणि तिबेट सैनिकांमध्ये संघर्षही झाला होता आणि हे कारण असू शकते की तिबेट सरकारनं करार केला नाही.  
आणखी बातम्या वाचा
 
यावेळी करारासाठी तिबेटची मान्यता असणे गरजेचं नाही, असं चीननं गृहीत धरलं कारण यावर स्वाक्षरी करण्यासाठी केंद्र सरकारनं ब्रिटीश अधिका-यांसोबत आपले राजदूत पाठवले होते.  मात्र ही बाब सत्य नाही. कारण 1890मध्यये चीनचा तिबेटवर ताबा नव्हता तर केवळ स्थायी प्रतिनिधित्व होतं. खरंतर करार न केल्यामुळे 1904मध्ये तिबेटवर कब्जा करण्याच्या उद्देशानं ब्रिटीश सरकारनं त्यांच्यावर हल्लाही केला होता.  चीननं यावर चुप्पी साधली आहे.  
 
तर दुसरीकडे, 1960मध्ये अधिका-यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान चीननं भुतान-तिबेट सीमा आणि सिक्कीम-तिबेट सीमेवर बोलणी करण्यास नकार दिला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताचे तत्कालनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या एका पत्राचा दाखला येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. यात असे सांगण्यात आले आहे की भारत सरकारनं 1890 करार केला होता ज्यात डोकलाम परिसरही समाविष्ट करण्यात आला होता. 
 
मात्र चिनी मंत्रालयानं हे सत्य लपवलं आहे की जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात भारत, भुतान आणि चीनमध्ये सिक्कीम-तिबेट-भुतानसंदर्भात कोणताही तोडगा निघाला नव्हता. चीन जो मार्ग बनवत आहे तो या परिसराच्या बराच जवळ आहे आणि यामुळे सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भविष्यात नुकसान होईल, अशी भीती भारतानं व्यक्त केली आहे.  आर्पी यांचे असे म्हणणे आहे की, नेहरू यांनी केवळ सिक्कीमच्या उत्तरेकडील सीमा मुद्यावर 1890चा करार केला होता.  मात्र, सिक्कीम-तिबेट-भुतानसंदर्भात त्यांनी सहमती दर्शवली नव्हती. यासंदर्भात भारत-चीनमध्ये 2012मध्ये बोलणी झाली होती, हा याचा पुरावा असल्याचंही ते म्हणालेत. यावेळी दोन्ही देशांतील विशेष प्रतिनिधींमध्ये बोलणी झाली होती. जोपर्यंत या परिसराबाबत कोणताही निर्णायक मार्ग निघत नाही तोपर्यंत आताच्या परिस्थितीत कोणताही बदल होऊ नये, यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती.