शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

"कृष्णानगरचं क्लिनिक माझी वाट पाहतंय"; BJP ने तिकीट कापल्यावर डॉ. हर्षवर्धन यांचा राजकारणाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 14:36 IST

डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत सविस्तर पोस्ट केली आहे. तसेच त्यांनी त्यामध्ये राजकारणापासून दूर राहण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.

भाजपाने 2024 च्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांनी यादी जाहीर होण्याआधीच सक्रिय राजकारणापासून दूर राहणार असल्याचं सांगितलं. मात्र आता यादी जाहीर झाल्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी देखील सक्रिय राजकारणापासून स्वत:ला दूर केलं आहे. 

डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत सविस्तर पोस्ट केली आहे. तसेच त्यांनी त्यामध्ये राजकारणापासून दूर राहण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. "तीस वर्षांहून अधिक काळ असलेल्या एका शानदार निवडणूक कारकीर्दीत, मी पाचही विधानसभा आणि दोन संसदीय निवडणुका लढवल्या, ज्या मी मोठ्या फरकाने जिंकल्या. पक्ष संघटनेत, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अनेक प्रतिष्ठित पदं भूषवली. आता मला माझ्या मूळ गोष्टींकडे परतण्याची परवानगी हवी आहे."

"पन्नास वर्षांपूर्वी, गरीब आणि गरजूंना मदत करण्याच्या इच्छेने मी कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला तेव्हा मानवतेची सेवा हे माझे ध्येय होते. मनापासून स्वयंसेवक असल्याने रांगेतील शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. संघाच्या तत्कालीन नेतृत्वाच्या विनंतीवरून मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो. माझ्यासाठी राजकारण म्हणजे आपल्या तीन प्रमुख शत्रूंशी लढण्याची संधी - गरिबी, आजार आणि अज्ञान."

"माझी खेळी अद्भुत होती ज्या दरम्यान मी सामान्य माणसाची सेवा करण्यात मग्न राहिलो. मी दिल्लीचे आरोग्य मंत्री तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून दोनदा काम केलं. हा विषय माझ्या हृदयाच्या जवळ आहे. भारताला पोलिओमुक्त करण्यासाठी प्रथम काम करण्याची आणि नंतर कोविड-19 संसर्गादरम्यान त्याच्याशी झुंज देत असलेल्या लाखो देशवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याची दुर्मिळ संधी मला मिळाली."

"मानवजातीच्या प्रदीर्घ इतिहासात, गंभीर धोक्याच्या वेळी लोकांचे रक्षण करण्याचा विशेषाधिकार काही लोकांनाच मिळाला आहे आणि मी अभिमानाने दावा करू शकतो की मी जबाबदारीपासून दूर गेलो नाही, उलट त्याचे स्वागत केले. भारतमातेबद्दल माझी कृतज्ञता, माझ्या देशवासियांबद्दलचा आदर आणि आपल्या संविधानात दिलेल्या मूल्यांबद्दल मला आदर आहे. यासोबतच प्रभू श्री रामाने मला दिलेले सर्वात मोठे सौभाग्य म्हणजे मानवाचे प्राण वाचवू शकलो."

"तंबाखू, हवामान बदलाविरुद्ध आणि साधी आणि शाश्वत जीवनशैली शिकवण्यासाठी मी माझे कार्य सुरूच ठेवेन. यशस्वी राजकीय जीवन जगत असताना माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सर्वांचे आभार मानतो. मी पुढे जात आहे, आता वाट पाहू शकत नाही. माझं एक स्वप्न आहे... आणि मला माहीत आहे की तुमचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहतील. कृष्णानगर येथील माझे ईएनटी क्लिनिक देखील माझ्या परत येण्याची वाट पाहत आहे" असं डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४PoliticsराजकारणBJPभाजपा