शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
2
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
3
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
4
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
5
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
6
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
7
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
8
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
9
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
10
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
11
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
12
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
13
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
14
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
15
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
16
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
17
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
18
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
19
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
20
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट

राज्यगीतातून एक वाक्य वगळल्याने भडकले मुख्यमंत्री; राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 9:03 AM

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारकडे राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी केली आहे.

Tamil Nadu Anthem :तामिळनाडूमध्ये हिंदी महिन्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात गायकांनी तामिळनाडूचे राज्यगीत गायले. पण गाण्यातून एक शब्द गायब होता. त्यावरून तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय गदारोळ सुरू झालाय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्यपालांवर टीका केली. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, राज्यपाल आरएन रवी यांनी हे आरोप दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. देशाच्या आत आणि बाहेर अशा शक्ती आहेत ज्यांना विकासात अडथळे आणायचे आहेत, असं राज्यपालांनी म्हटलं.

चेन्नईमध्ये दूरदर्शनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी हिंदी महिन्याच्या समारोपाच्या वेळी गायलेल्या 'तमिळ थाई वाझ्थु' या राज्यगीतामधून द्रविडियन शब्द काढून टाकल्याबद्दल राज्यपाल आर.एन. रवीवर निशाणा साधला. दूरदर्शनच्या चेन्नई कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासह राज्यपाल आर.एन. रवी सहभागी झाले होते. या वादानंतर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारकडे राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी केली आहे.

मात्र, राजभवनाने स्टॅलिन यांनी केलेल आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यपाल आर.एन. रवी फक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि ज्यांनी हे गाणे गायले त्यांच्याकडून अनवधानाने हा शब्द राहून गेला. राज्यगीत गाणाऱ्या गायकांनी चुकून 'थेक्कामुम अधीरसिरंधा द्रविड नल थिरुनाडुम' ही ओळ वगळली होती, जी द्रविड भूमीतील एका महिलेचा संदर्भ देते. ही ओळ वगळल्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राष्ट्रगीतामधून द्रविड हा शब्द काढून टाकण्याचे धाडस राज्यपाल करतील का, असा सवाल केला. स्टॅलिन यांनी हा तामिळनाडू आणि तमिळ भाषेचा अपमान असल्याचे म्हटले आणि राज्यपाल रवी यांना द्रविडांची ॲलर्जी असल्याचे सांगून  केंद्राकडे त्यांना तात्काळ हटवण्याची मागणी केली.

"राज्यगीतामधून द्रविड शब्द काढून टाकणे तामिळनाडूच्या कायद्याविरुद्ध आहे. कायद्याचे पालन न करणारी व्यक्ती पदावर राहण्यास पात्र नाही. भारताचा उत्सव साजरा करण्याच्या नावाखाली राज्यपाल देशाच्या एकात्मतेचा आणि विविध जातींच्या लोकांचा अपमान करत आहेत. राष्ट्रगीतातूनही द्रविड शब्द टाकण्यास राज्यपाल सांगतील का? केंद्र सरकारने तात्काळ राज्यपालांना बोलावले पाहिजे कारण ते जाणूनबुजून तामिळनाडू आणि तेथील जनतेच्या भावनांचा अपमान करत आहेत," असं मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल रवी यांनी या प्रकरणावर स्टॅलिन यांनी आपल्या विरोधात अवास्तव विधाने केली असून त्यांना जातिवादी म्हटले आहे. प्रत्येक कार्यक्रमात ते तमिळ थाई वाझ्थू पूर्ण आदराने गातात, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांचे माध्यम सल्लागार थिरुग्नाना संबंदम यांनी एका निवेदनात म्हटले की, गायकांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला द्रविडीयन शब्द असलेली ओळ अनवधानाने वगळली होती. त्यांनी या प्रकरणाची माहिती आयोजकांना देऊन अधिकाऱ्यांनी याकडे योग्य लक्ष देण्याची विनंती केली.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू