शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील...
2
"आयुष्य खटाखट नाही..."; जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा, स्पष्टच बोलले
3
"मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून"; मंत्री उदय सामंतांनी थेटच सांगितलं
4
शेख हसीना देशात परत जाणार? बांगलादेशात व्हायरल 'कॉल'ची चर्चा; नेमकं प्रकरण काय?
5
“आरक्षणविरोधी राहुल गांधी अन् काँग्रेसचा खरा चेहरा उघड, जनताच आता उत्तर देईल”; भाजपाची टीका
6
आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी? काँग्रेसचा सवाल
7
“देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ
8
“१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण
9
“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला
10
शत्रूचं ड्रोन अन् फायटर जेटच्याही हवेतच उडणार चिंधाड्या, भारतानं तयार केलं 'अप्रतिम' क्षेपणास्त्र!
11
"आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय"; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप
12
“फडणवीसांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले, आता सुट्टी नाही; हिशोब घ्यायचा”: मनोज जरांगे
13
बाप्पाची सेवा करणारी 'ही' अभिनेत्री कोण? शाहरूख, सलमानसोबत हिट सिनेमांमध्ये केलंय काम
14
Port Blair renamed: अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं; आता 'या' नावाने ओळखलं जाणार!
15
Jayant Patil : "तासगावची सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या रोहितला स्पष्टच सांगितलं
16
“धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?”; बजरंग सोनावणेंचा सवाल
17
महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 
18
जिंकलोsss.... संघाच्या विजयानंतर चक्क कुबड्या घेऊन आला मैदानात, केलं तुफान सेलिब्रेशन (Video)
19
महेश कोठारेंचा कोणता सिनेमा बेस्ट आहे? सचिन पिळगावकरांनी घेतलं 'या' चित्रपटाचं नाव

पिण्याचं सोडा, आंघोळीच्या योग्यही नाही गंगेचं पाणी

By admin | Published: May 18, 2017 12:28 PM

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एका आरटीआयला उत्तर देताना सांगितलं आहे की, हरिद्वारमध्ये गंगेचं पाणी आंघोळीसाठीही योग्य नाही

ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. 18 - गंगेत आंघोळ केल्याने तुमचं पाप धुतलं जातं की नाही हे सांगणं कठीण आहे, पण या पाण्यामुळे तुम्ही आजारी पडाल एवढं मात्र नक्की. हरिद्वारला गेल्यानंतर गंगेत डुबकी मारल्यानंतर कदातिच तुम्हाला चांगलं वाटेल, मात्र हे पानी इतकं प्रदूषित आहे की प्यायचं सोडा, साधं आंघोळीच्या योग्यही नाही आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने एका आरटीआयला उत्तर देताना सांगितलं आहे की, हरिद्वारमध्ये गंगेचं पाणी आंघोळीसाठीही योग्य नाही. 
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार गंगेचं पाणी सर्व दृष्टीने असुरक्षित आहे. अधिकृत आकडेवारीनुार हरिद्वार किनारी असलेल्या 20 घाटांवर रोज तब्बल 50 हजार ते एक लाख भक्त गंगेत डुबकी घेत स्नान करत असतात. 
 
उत्तराखंडमधील गंगोत्रीपासून ते हरिद्वारपर्यंत 11 ठिकाणी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने घेण्यात आले होते. 294 किमी परिसरातील 11 ठिकाणांची यासाठी निवड करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी चार प्रमुख गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं, ज्यामध्ये तापमान, पाण्यात मिसळलेला ऑक्सिजन, बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) आणि कॉलिफॉर्म (बॅक्टेरिया) यांचा समावेश होता. हरिद्वारजवळील गंगेच्या पाण्यात BOD, कॉलिफॉर्म आणि काही विषारी घटक आढळले आहेत. 
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांनुसार आंघोळीच्या एक लिटर पाण्यात BOD ची क्षमात किमान 3 मिलीग्रामपेक्षा कमी असली पाहिजे. मात्र इथे हा स्तर 6.4 मिलीग्राम आहे. अनेक ठिकाणी कॉलिफॉर्मचं प्रमाणदेखील जास्त आढळलं आहे. जिथे पाण्यात कॉलिफॉर्मचं प्रमाण 90 एमपीएन (मोस्ट प्रॉबेबल नंबर) असणं अपेक्षित आहे, तिथे हे प्रमाण 1,600 एमपीएन आढळलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार आंघोळीच्या  100 मिमी पाण्यात कॉलिफॉर्मचं प्रमाण 500 एमपीएनपेक्षा कमी असलं पाहिजे.