शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

दुष्काळाकडे आपत्ती म्हणून का पाहिलं जात नाही ? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

By admin | Published: April 13, 2016 2:21 PM

दुष्काळ नैसर्गिक आपत्ती असून दुष्काळाला आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली का आणलं जाऊ शकत नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १३ - दुष्काळ नैसर्गिक आपत्ती असून दुष्काळाला आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली का आणलं जाऊ शकत नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे केली आहे. दहा राज्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहता न्यायालयाने ही विचारणा केली आहे. दुष्काळाला  आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आणल्यास पिडीत कुटुंबांच्या मदतीसाठी निधी दिला जाऊ शकतो असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे.
 
अनेक राज्यांनी अजूनपर्यंत दुष्काळ जाहीर केलेला नाही त्यामुळे न्यायाधीश मदन लोकूर आणि रामाना यांच्या खंडपीठाने ही संकल्पना मांडली आहे. दुष्काळ जाहीर करणे राज्यांच्या अख्त्यारित येत असल्याने आपले हात बांधले असून आपण दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही असं केंद्राने न्यायालयात सांगितलं आहे. .यावर दुष्काळामुळे गंभीर समस्या निर्माण झाली असेल आणि लोकांचे हाल होत असतील तरी केंद्र आपण मध्यस्थी न करता काहीच करु शकत नाही असं म्हणू शकते का ? असा सवाल न्यायालयाने केंद्राला विचारला. 
दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोणताच नियम नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नरसिम्हा यांनी न्यायालयात सांगितलं आहे. दुष्काळाला आपत्ती व्यवस्थापन कायद्यात घेतलं गेलं नसलं तरी पिकांच्या नुकसानीअंतर्गत मदत दिली जाऊ शकते असं मत नरसिम्हा यांनी खंडपीठासमोर व्यक्त केलं आहे. न्यायालयाने दुष्काळाचा फटका किती जिल्ह्यांना आणि लोकांना बसला आहे याची माहिती मागवली आहे, तसंच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आपत्तीसाठी किती निधी मंजूर केला जातो याची माहितीदेखील देण्यास सांगितलं आहे. केंद्राने 19 एप्रिलला पुढील सुनावणीदरम्यान सर्व माहिती देण्याचं आश्वासन न्यायालयात दिलं आहे.