शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
6
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
7
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
8
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
9
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
11
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
12
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
14
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
16
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
17
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
18
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
19
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
20
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

दुष्काळ; जागतिक बँक-फडणवीस

By admin | Published: April 26, 2016 1:59 AM

दुष्काळ निवारणासाठी जागतिक बँकेला साकडेमुख्यमंत्री : ५ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव सादरमुंबई : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ...


दुष्काळ निवारणासाठी जागतिक बँकेला साकडे
मुख्यमंत्री : ५ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव सादर
मुंबई : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेकडून ५ हजार कोटींचे कर्ज मागितले असून तसा प्रस्तावही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाड्यातील ३ हजार गावे आणि विदर्भातील २ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यास मोठी मदत होईल. तसेच जलसंवर्धनाच्या कामावरही भर देता येईल. त्यानंतर दुष्काळी भागासाठी पीकपद्धत बदलण्याचा निर्णय घेतला जाईल. ही योजना मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात राबविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जलसंवर्धन ते पीक पद्धतीत बदल करणे, यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून दुष्काळाचे निवारण करण्यासाठी जागतिक बँकेने दुष्काळ निवारण निधीतून ५ हजार कोटींचे कर्ज देऊन मदत करावी, अशी जागतिक बँकेला विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ही मदत मागण्यात आल्याचे त्यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
जागतिक बँकेच्या दुष्काळ निवारण निधीतून हे कर्ज मिळण्यास साधरणत: दीड वर्षे लागते. परंतु, महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर आमच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशी विनंती जागतिक बँकेच्या अधिकार्‍यांना केली आहे.