शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर्नाटकात सत्तांतरासाठी बंडखोर आमदार नव्हे, तर काँग्रेसला 'ही' चूक नडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 16:50 IST

एचडी देवेगौडा यांनी राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले होते. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले होते. त्यानंतर आपण कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. याची माहिती खुद्द देवेगौडा यांनीच दिली होती.

मुंबई - कर्नाटकमध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा अखेर शेवट झाला. सत्तेच्या चाव्या आता पुन्हा एकदा भाजपनेते माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे आल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेनंतर आणि राहुल गांधीकाँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच काँग्रेसला कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली होती. काँग्रेसने जनता दल सेक्युलरसोबत सरकारही स्थापन केले. मात्र हे सरकार अखेर कोसळले. याला काँग्रेसची कर्नाटकमध्ये चांगले यश मिळविल्यानंतर केलेली चूकच कारणीभूत ठरली.

देवेगौडा यांना जेडीएस-काँग्रेसची युती व्हावी अशी इच्छा नव्हती. ते आजही त्यांच्या मतांवर ठाम आहेत. खुद्द काँग्रेसने त्यांच्याकडे जाऊन तुमचा मुलगा मुख्यमंत्री होणार, काहीही होवो, असं सांगितले. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नव्हता, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी. कुमारस्वामी यांचे वडील एचडी देवेगौडा यांनी म्हटले होते.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरमया, मुल्लिकार्जुन खरगे, मुनियप्पा आणि परमेश्वर देवेगौडा यांच्याकडे गेले होते. त्यावेळी खरगेंना मुख्यमंत्री करा. त्यावर खरगे म्हणाले होते की, काँग्रेस हायकमानने सांगितल्यास आपण तयार आहोत. त्यानंतर देवेगौडा यांनी राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले होते. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले होते. त्यानंतर आपण कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. याची माहिती खुद्द देवेगौडा यांनीच दिली होती.

दरम्यान बंडखोरांमध्ये सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत. परंतु, खरगे किंवा सिद्धरमया यांच्यापैकी कुणी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते, तर बऱ्याच प्रमाणात काँग्रेसमधील बंडखोरीला वेसन घालता आली असती. परंतु, काँग्रेसने मुख्यमंत्रीपद स्वत:हून नाकारल्याने कर्नाटकच्या सत्ताकारणातील समिकरणे चुकत गेली. त्याचा अखेर कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतरच झाला.