शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

हनीमूनला येणा-या जोडप्यांमुळे केदारनाथमध्ये महापूर - शंकराचार्य

By admin | Published: April 13, 2016 9:00 AM

केदारनाथमध्ये २०१३ मध्ये आलेल्या प्रलयकारी महापूरासाठी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी हनीमूनसाठी येणा-या जोडप्यांना जबाबदार धरले आहे.

ऑनलाइन लोकमत 

हरिव्दार, दि. १३ - केदारनाथमध्ये २०१३ मध्ये आलेल्या प्रलयकारी महापूरासाठी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी हनीमूनसाठी येणा-या जोडप्यांना जबाबदार धरले आहे. केदारनाथला हनीमून साजरा करण्यासाठी येणा-या जोडप्यांमुळे महापूराची आपत्ती ओढवली असे वादग्रस्त विधान व्दारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे. 
 
पवित्र हिंदू स्थळांवरील पर्यावरण असेच प्रदूषित होत राहिले तर, आणखी एखादी अशी आपत्ती ओढवेल असा इशारा त्यांनी दिला आहे. देशाच्या विविध भागातून पिकनिक, हनीमूनची मजा करण्यासाठी लोक देवभूमी उत्तराखंडमध्ये येतात. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी केदारनाथमध्ये महापूर आला होता. अशा अपवित्र गोष्टी इथे थांबल्या नाहीत तर पुन्हा अशीच आपत्ती ओढवेल असे स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे. 
 
शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश द्यायलाही त्यांचा विरोध होता. शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला तर, महिलांविरोधात बलात्कार, विनयभंगाच्या घटना वाढतील असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू यांनी स्वरुपानंदांच्या विधानाशी असहमती दर्शवत त्यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले होते.