शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

राज्यात २५ लाख गाठींनी घटले उत्पादन कपाशीवर परिणाम : सरकीमधील तेजीने भाववाढ

By admin | Published: February 02, 2016 12:15 AM

सेंट्रलडेस्कसाठी

सेंट्रलडेस्कसाठी
चंद्रकांतजाधव/जळगाव- देशात १५ लाख तर राज्यात तब्बल २५ लाख गाठींनी कापसाचे उत्पादन घटले आहे. यासंदर्भात येत्या ५ रोजी कापूस सल्लागार मंडळाच्या (सीएबी) मुंबई येथे आयोजित बैठकीत चर्चा होणार असून, उत्पादनातील घटीच्या दृष्टीने पुढील नियोजन होईल.

देशात यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सहा लाख हेक्टरने कपाशीच्या लागवडीत घट झाली होती. तर अखेरपर्यंत ३६५ लाख गाठींचे उत्पादन आले होते. यंदा ११९ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्यातून ३५० लाख गाठींचे उत्पादन आले. याचा अर्थ देशात १५ लाख गाठींचे उत्पादन घटले आहे.

राज्यात मागील वर्षी ४१.७१ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. तर ८५ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा ३९.७२ लाख हेक्टरवर लागवड झाली आणि त्यातून आतापर्यंत ६० लाख गाठींचे उत्पादन आले आहे. या वृत्तास राज्याच्या सूतगिरणी कार्यकारी संचालक असोसिएशनचे सदस्य आर.डी.पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
खोडवा खराब झाला...
राज्यात विदर्भासह खान्देशात कपाशीचा खोडवा (फरदड) घेतला जातो. पण खोडवा तुडतुडे, चिकटा व इतर समस्यांमुळे खराब झाला. कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकर्‍यांनी कपाशीचे पीक काढून रब्बी पिकांच्या पेरणीस पसंती दिली. यामुळे पुढे कपाशीचे उत्पादन वाढेल ही आशा धूसर झाली आहे.
सरकी तेजीत
कपाशीला भाव बर्‍यापैकी आहे. सरकी तेजीत असल्याने भाव बरे आहेत. मागील वर्षी सरकीला १७०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. यंदा २२०० रुपयांपर्यंत भाव आहे. तर खंडीला (३५६ किलो रुई) कमाल ३४००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
सीएबीचा अंदाज ठरला खरा
कापूस सल्लागार मंडळाने सुरुवातीलाच देशात ३५१ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. उत्पादनातील घट झालेली असली तरी देशांतर्गत बाजारात गाठींचा उठावही कमी आहे. यामुळेे उत्पादनातील घटीला सूतगिरण्या, कापड मील्सवर परिणाम होणार नाही.

कोट-
सरकीमुळे कपाशीला भाव आहे. पुढेे आणखी वाढू शकतात. पण जागतिक बाजारात सूताच्या कापडाला फारशी मागणी नाही. यामुळे खंडीचे किंवा रुईचे भाव कमी आहेत.
-अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

इन्फो-
देशातील गाठींचे उत्पादन व निर्यातीची माहिती
(आकडे लाख गाठींमध्ये)
वर्षउत्पादननिर्यात
२००५-०६१८५२८
२००६-०७२२६३१
२००७-०८२५९८५
२००८-०९२९५६५
२००९-१०३४३५५
२०१०-११३६५७५
२०११-१२३५३१२८
२०१२-१३३८०११४
२०१३-१४३६०११२
२०१४-१५३८३५५
२०१५-१६३५० ५२