शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

रस्त्यांच्या कामात उशीर होत असल्याने भारताला 1.4 लाख कोटींचं नुकसान

By admin | Published: June 08, 2016 1:07 PM

खराब रस्ते, त्यामुळे ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अतिरिक्त वापर याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे

ऑनलाइन लोकमत  
नवी दिल्ली, दि, 08 - खराब रस्ते, त्यामुळे ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अतिरिक्त वापर याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. भारताला यामुळे वर्षाला 1.4 लाख कोटींचं नुकसान होत आहे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑप इंडिया आणि आयआयएम-कोलकाताने संयुक्तरित्या केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
 
भारताला होत असलेल्या आर्थिक नुकसानात इंधनाचा अतिरिक्त वापर सर्वात महत्वाचं कारण असल्याचं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. 
 
इंधन खर्च 97 हजार कोटींपर्यंत 
अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार खराब रस्त्यांमुळे होणारा उशीर यामुळे वर्षाला अंदाजे 6.6 अरब डॉलरचं नुकसान होतं. तर इंधनाच्या अतिरिक्त वापराचा खर्च वर्षाला 14.7 अरब डॉलर होत आहे. भारतामध्ये वाहतुकीसाठी साधने मर्यादित आहेत. त्यामुळे सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी रस्त्याचा किंवा रेल्वेचा अधिक वापर केला जातो. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे देशातील महत्वाच्या 28 मार्गावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केल्याचं गडकरींनी सांगितलं आहे. 
 
वाहूतक करण्यासाठी हवाई आणि पाणीमार्गाचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करण्यात येतो. रस्ते वाहतूक खात्रीची तसंच कार्यक्षम असल्याने अनेकजण रस्त्याने प्रवास करणे पसंत करतात. रस्त्याने प्रवास केल्याने ठरल्या वेळेत पोहोचता येतं. मात्र रेल्वेमध्ये बिघडलेलं वेळापत्र, अपुरी सेवा, सामान ठेवण्यासाठी डब्यांमध्ये नसलेली जागा यामुळे रेल्वेने प्रवास करणं टाळलं जात असं अभ्यासात दिसून आलं आहे. 
 
गेल्या तीन वर्षात 2011-12शी तुलना करता दिल्ली - बंगळुरु आणि दिल्ली - मुंबई मार्गावत वाहतूक दरापेक्षा वाहतूक खर्चच जास्त वाढल्याचं निदर्शनात आलं आहे.