शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटींचा बोजा

By admin | Published: May 11, 2016 6:07 PM

देशातली जवळपास 10 राज्यं ही दुष्काळात होरपळत असून, त्याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11- गेल्या दोन वर्षांपासून देशातली अनेक राज्यं दुष्काळात भरडून निघाली आहेत. पावसाचं अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई  आणि धरणांनी गाठलेला तळ या परिस्थितीमुळे 10 राज्यांवर दुष्काळाचं सावट येऊन ठेपलं आहे.  महाराष्ट्र आणि कर्नाटकसारखी राज्यंही या दुष्काळापासून वाचू शकली नाहीत. 
टाइम्स ऑफ इंडियानं केलेल्या सर्व्हेनुसार, देशातली जवळपास 10 राज्यं ही दुष्काळात होरपळत असून, त्याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आहे. दुष्काळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटींचा बोजा पडला आहे. 256 जिल्ह्यांतले 33 कोटी लोक या दुष्काळामुळे मरणपंथाला लागले आहेत. दुष्काळामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटी ते 1 लाख कोटींचा बोजा पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुष्काळाचा गेल्या 6 महिन्यांपासून अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडतो आहे, अशी माहिती मिळाली आहे. या वर्षी पाऊस वेळेनुरुप पडण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला असल्यानं शेतक-यांना काहीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 
सरकार दुष्काळग्रस्तांना पाणी, अन्न आणि आरोग्याच्या सुविधेसाठी प्रतिमाणसी 3 हजारांची मदत करते. जवळपास 33 कोटी दुष्काळग्रस्त हे जोखीम पत्करून जगत आहेत. प्रत्येक महिन्याला दुष्काळग्रस्तांसाठी अर्थव्यवस्थेवर 1 लाख कोटींचा बोजा पडतो, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेतून समोर आली आहे. दुस-या बाजूनं विजेवर दिलेलं अनुदान, स्वस्त दरात उपलब्ध करून दिलेली खतं यामुळे अर्थव्यवस्थेला भुर्दंड पडतो आहे. तसेच दुष्काळग्रस्तांचा शहराकडे वाढलेल्या लोढ्यांमुळेही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थव्यवस्थेवर दबाव पडतो आहे. दुष्काळाचा शेतक-यांच्या मुलं आणि पत्नींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो असल्याची माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवरचा फुगवटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.