शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

दुष्काळामुळे ग्रामीण भागात वस्तूंचा खप घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2016 2:25 AM

गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, त्यातही दोन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागावर झाला असून वस्तूंचा खप कमालीचा घटला आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, त्यातही दोन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागावर झाला असून वस्तूंचा खप कमालीचा घटला आहे. शेतकऱ्यांसोबतच एफएमसीजी आणि फूड सेक्टरवर त्याचा थेट परिणाम झाला आहे.१२ व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या चार वर्षांत देशाच्या कृषी विभागाचा विकासाचा दर अवघा १.६ टक्के राहिला. खरे तर हे लक्ष्य ४ टक्के होते. पाऊस कमी पडत असल्याने कृषी क्षेत्रात ही घसरण झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.कमी पावसामुळे कपाशी, सोयाबीन, ऊस आणि आंबा यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आंबा हे महत्त्वाचे पीक आहे. दुष्काळामुळे दोन्ही राज्यांत यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कृष्णा जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ५० टक्के होण्याची शक्यता असल्याचे कृष्णा जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या सहायक संचालक एन. सुजाता यांनी सांगितले.पाऊस कमी झाल्याने उसाची लागवड कमी होऊन उत्पादनही घटले. त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर झाला. परिणामत: ऊसतोड कामगार लवकर घरी परतले आणि कारखान्यांचे गाळपही लवकर बंद झाले. दुष्काळग्रस्त भागात आम्हाला आर्थिक वृद्धी दिसत नाही. ग्राहक स्वस्त तेलाकडे वळले आहेत. त्यामुळे चांगल्या तेलाची विक्री घटली आहे.गारपीट, अवकाळीने १.३ कोटी टन गव्हाचे नुकसानअवकाळी पावसासोबत गारपिटीने १.३ कोटी टन गव्हाचे नुकसान होण्याचा अंदाज एका अभ्यासात वर्तविण्यात आला आहे. कदाचित गव्हाची आयात करावी लागेल.असोचेमने याबाबतचा अहवाल जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, उत्पादनात घट झाल्याने चलनवाढ होऊ शकते. असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले की, गव्हावरील आयात शुल्क घटवून १० टक्क्यांवरून पाच टक्के करण्याची गरज आहे. तसे झाल्यास खासगी व्यापारी गव्हाची समांतर आयात करतील आणि गहू सहज उपलब्ध होईल, त्यामुळे स्टॉक आणि किमतीवरील दडपणही कमी होईल.९.३ कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण त्यात आता १.३ कोटी टन घट होण्याची शक्यता आहे. सरकारला गव्हाची आयात करण्याचाही विचार करावा लागेल.