शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 15:48 IST

छत्तीसगडच्या महासमुंदपासून १३५ किमी अंतरावर दुर्गम परिसरात असणाऱ्या या गावाचं नाव 'राफेल' असं आहे. देशात राफेल मुद्दा निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याने राफेल हे नाव गावकऱ्यांसाठी समस्येचे कारण बनलं आहे. 

नवी दिल्ली - सध्या देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना निवडणुकीच्या रिंगणात सर्वात चर्चेत मुद्दा आहे तो म्हणजे राफेल. राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय. काँग्रेसनेराफेल मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं असून अनिल अंबानी यांना फायदा होण्यासाठीच हा करार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. इतकचं नाही तर राफेलवरुन चौकीदार चोर है अशी मोहीमही काँग्रेसकडून सोशल मिडीयात उभारण्यात आली. 

मात्र हा राफेल मुद्दा छत्तीसगडमधील एका गावासाठी मोठी समस्या बनला आहे. छत्तीसगडच्या महासमुंदपासून १३५ किमी अंतरावर दुर्गम परिसरात असणाऱ्या या गावाचं नाव 'राफेल' असं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात राफेल मुद्दा निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याने राफेल हे नाव गावकऱ्यांसाठी समस्येचे कारण बनलं आहे. 

राफेल गावातील ग्रामस्थांचे म्हणणं आहे की, जेव्हापासून राफेल प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापू लागलंय तेव्हापासून राफेल नावावरुन असलेल्या या गावाची आजूबाजूच्या गावांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. जर समजा भविष्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आला आणि त्यांनी राफेलची चौकशी केली तर या गावावरही कारवाई केली जाईल असा विनोद शेजारील गावातील गावकरी करत आहेत. याचं कारणं काय तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं की, काँग्रेस सत्तेत आल्यावर लगेच राफेलची चौकशी करु. अन् नेमकं या गावाचं नावचं राफेल आहे. त्यामुळे राफेलची चौकशी होणार म्हणजे या गावावर कारवाई केली जाणार अशाप्रकारे खिल्ली इतर ग्रामस्थ उडवत आहेत. राफेल हे गाव छत्तीसगड राज्यातील दुर्गम भागात आहेत त्यामुळे या गावाकडे अद्याप कोणाचंही लक्ष गेलं नाही. मात्र देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय त्यामुळे राफेल गाव सोशल माध्यमांमध्ये चर्चेत आलं आहे. 

१९९८ च्या पूर्वी राफेल गाव छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात समाविष्ट होतं मात्र त्यानंतर महासमुंद या जिल्ह्यामध्ये गावाचा समावेश करण्यात आला. अतिशय दुर्गम भागात हे गाव असल्याने आत्तापर्यंत गावचा विकासच झाला नाही. राफेल ग्रामस्थ शेतीवर निर्भर असल्याने शेती पण पावसावर अवलंबून आहे. पंतप्रधान कोणीही बनो मात्र या गावात सिंचनाची व्यवस्था आली पाहिजे असं गावकऱ्यांचे म्हणणं आहे. निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात राफेल ग्रामस्थ मतदानासाठी जाणार आहेत. देशभरात राफेलवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये रणकंदन माजलं असताना अद्यापपर्यंत या गावात ना भाजपाचा कोणी नेता आला ना काँग्रेसचा नेता प्रचारासाठी आला. जवळपास २०० कुटुंब या गावात वास्तव्यास आहे. 

काँग्रेस सत्तेत आल्यावर राफेल गावावर कारवाई होणार असल्याचं शेजारील गावातील लोकं आमची खिल्ली उडवतात. आम्ही गावाचं नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो मात्र आम्हाला त्यांची भेट झाली नाही असं या गावातील ग्रामस्थ धरम सिंग यांनी सांगितले. तसेच राफेल प्रकरणामुळे या गावाची नकारात्मक प्रसिद्धी झाली पण आमच्या गावाची चिंता कोणालाच नाही असंही ते बोलले. 

महासमुंद विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे चांदुल शाहू हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघात राफेल गावाचा समावेश होतो. राफेलवरुन भाजपा-काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे होत असले तरी राफेल गाव मात्र विकास, जलसिंचन आणि मूलभूत सुविधांपासून वंचितच राहिलं हे सत्य कोणी नाकारु शकणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRafale Dealराफेल डीलChhattisgarhछत्तीसगडmahasamund-pcमहासमंदChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा