शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे देशभरात एका वर्षात ११ हजार जणांचा मृत्यू

By admin | Published: September 14, 2015 10:31 AM

रस्त्यावरील खड्डे व स्पीड ब्रेकर्स आता जीवघेणे ठरु लागले असून गेल्या वर्षभरात खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे देशभरात तब्बल ११ हजार ४०० जणांना जीव गमवावा लागला आहे.

ऑनलाइन लोकमत  

नवी दिल्ली, दि. १४ - रस्त्यावरील खड्डे व स्पीड ब्रेकर्स आता जीवघेणे ठरु लागले असून गेल्या वर्षभरात खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे देशभरात तब्बल ११ हजार ४०० जणांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात याच कारणामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण ३६८ एवढे आहे. 

 
केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने 'रस्ते अपघात अहवाल - २०१४' हा अहवाल नुकताच प्रकाशित केला असून या अहवालात पहिल्यांदाच खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे होणारे अपघात याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. २०१४ या वर्षात ११,४०० जणांचा स्पीड ब्रेकर व खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यात सर्वात आघाडीवर उत्तर प्रदेश असून उत्तरप्रदेशमध्ये एका वर्षात तब्बल ४,४४५ जणांचा या कारणामुळे मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश (९१५), बिहार (८६७) या राज्यांचा क्रमांक लागला आहे. रस्त्यांची योग्य देखभाल न करणे व नियम पायदळी तुडवून स्पीड ब्रेकर तयार केल्याचे परिणाम या अहवालातून उघड झाले आहेत. आता सरकारी यंत्रणांनी या तक्रारींकडे गांभीर्याने बघावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.