शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आपल्याच गडावर लाल बावटा पुरता संकोचला, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचीही दंडेलशाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:40 IST

एकेकाळी केरळप्रमाणे डाव्यांचा गड म्हणून ओळख जपलेल्या पश्चिम बंगालच्या यंदाच्या निवडणुकीत डावे जणू अडगळीत गेल्यासारखेच दिसत आहेत.

- किरण अग्रवालकोलकाता - एकेकाळी केरळप्रमाणे डाव्यांचा गड म्हणून ओळख जपलेल्या पश्चिम बंगालच्या यंदाच्या निवडणुकीत डावे जणू अडगळीत गेल्यासारखेच दिसत आहेत. सध्या तिथे ममतादीदी व नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला असल्याने आपल्याच गडावर लाल बावटा संकोचला आहे.या राज्यात सात टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत चार टप्प्यात १८ जागांसाठी मतदान झाले. पुढच्या तीन टप्प्यात २४ जागी निवडणूक होईल. पहिल्या चार टप्प्यात जागोजागी गोंधळ, हाणामाऱ्या झाल्या. असनसोलमध्ये केंद्रातील विद्यमान मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची तृणमूल कार्यकर्त्यांकडून नासधूस केल्याचा आरोप झाला. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. चौथ्या टप्प्यात इथे तब्बल ७६.४४ टक्के नोंदविला गेला. या राज्यात पूर्वी सत्ता राखताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जे प्रकार अवलंबिले तेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक ते तृणमूल काँग्रेसने अंगीकारलेले दिसतात. सध्या माकपचे २ तर तृणमूलचे ३४ खासदार आहेत.पाचव्या टप्प्यात ८ जागांसाठी मतदान आहे. यासाठी ८३ उमेदवार रिंगणात आहेत. पैकी २३ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, १८ जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.देशात मिलावटचे म्हणजे अनेक पक्षांचे सरकार आले तर आठवड्यात प्रत्येक दिवशी एका पक्षाचा पंतप्रधान असेल, त्यात सुट्टीच्या दिवशी फारसे काम नसते त्यामुळे रविवारी ममतांचा नंबर लागेल, अशी खिल्ली भाजप नेते मुकुल राय यांनी उडविली आहे.आरोप-प्रत्यारोपांच्या जुमलेबाजीत विकास गहाणराज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा स्पर्धक म्हणून भाजपकडे पाहिले जाते. डावे पक्ष सातत्याने मागे पडत आहेत. ममता बॅनर्जी मोदी यांचे केंद्रातील सरकार उखडून फेकण्याचा प्रचार करतात तर मोदी यांनी बंगालमधील घुसखोरी व कूप्रशासनावर हल्लाबोल करतात. विकासाच्या मुद्द्यांऐवजी आरोप-प्रत्यारोपांची जुमलेबाजी सुरू आहे.- अजय विद्यार्थी(वरिष्ठ पत्रकार), कोलकाताविकासाची चर्चा पडली मागेमाकप व काँग्रेसची अवस्था गेल्या २०१४ च्या निवडणुकीपेक्षाही यंदा बिकट आहे. भाजप पर्याय म्हणून पुढे आल्याने त्याला मतदान वाढू शकते. पण तरीही तृणमूल काँग्रेसच्याच जागा अधिक असतील. काही ठिकाणी मतदारांना मतदानापासून रोखल्याचे आरोप होत आहेत. तृणमूलचा मोदी हटाववर भर आहे. विकासाची चर्चा होताना दिसत नाही.- के. निर्मल(व्यावसायिक), कोलकाता 

टॅग्स :Communist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक