शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 08:37 IST

विरोधकांनी लोकशाहीवरील विश्वास उडविण्याचे काम केल्याचा पंतप्रधानांचा आरोप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विरोधक लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडविण्याचा आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या निवडणुकीतील विजयावर पराभवाची छाया पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. सत्ताधारी गटाने या निवडणुकीत मोठा विजय मिळवला, असे सांगत त्यांनी आघाडी आणि आकडेवारीच्या संदर्भात पाहिल्यास ‘एनडीए’चे सर्वात मजबूत आघाडी सरकार आहे, अशी ग्वाही दिली. 

संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केल्याबद्दल विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना फटकारले आणि आरोप केले की जर निकाल त्यांना अनुकूल नसेल तर ते देशभरात आगडोंब उसळण्याची भाषा करत होते. तथापि, ईव्हीएमने ४ जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांची बोलती बंद केली. हे निकाल म्हणजे त्यांच्या सरकारच्या अजेंड्याला देशव्यापी पाठिंबा मिळाल्याचा दावा मोदी यांनी केला. 

सर्व निर्णयांमध्ये एकमत साध्य करणे हेच लक्ष्य पुढच्या सरकारच्या सर्व निर्णयांमध्ये एकमत व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आणि एनडीए ही ‘प्रथम राष्ट्र’ या तत्त्वाशी बांधील असलेली एकजीव आघाडी आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. परस्पर विश्वास हा या युतीचा गाभा आहे आणि आपण ‘सर्व पंथ समभाव’ या तत्त्वाशी बांधील आहेत,  असेही त्यांनी सांगितले.

मोदी म्हणाले....इंडिया आघाडी वेगाने रसातळाला जाणार हे स्पष्ट दिसत आहे. विरोधकांचा सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करून निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षांची मानसिकता गेल्या शतकातील. त्यांचा प्रगती, आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा विरोध. मी जगभरात भारत ही ‘लोकशाहीची जननी’ असल्याचा ढोल वाजवत असताना विरोधक मात्र भारतात लोकशाही नसल्याचे जगाला सांगतात. आमची १० वर्षे फक्त ट्रेलर होती. आम्ही देशाच्या विकासासाठी अधिक कठोर आणि वेगाने काम करू.

नऊ नेत्यांनी दिले अनुमोदनसंसदेच्या संकुलाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत भाजपच्या तीन नेत्यांसह मित्रपक्षांच्या नऊ नेत्यांनी मोदींच्या निवडीला अनुमोदन दिले. आपल्या सरकारची धोरणे आणि कार्यक्रम ठळकपणे मांडताना मोदींनी वारंवार ‘एनडीए’चा उल्लेख केला.याशिवाय एनडीएचे सहकारी तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) एन. चंद्राबाबू नायडू आणि जेडी(यू)चे नितीश कुमार यांच्यासह विविध सदस्यांनी आपापल्या राज्यात विकास कसा घडवून आणला याचा उल्लेखही केला. 

काँग्रेसला दशकानंतरही १०० चा आकडा गाठता आला नाही“काँग्रेसला २०१४ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीत आम्हाला मिळाल्या आहेत. दशकानंतरही त्यांना १०० चा आकडा गाठता आलेला नाही, याकडे मोदींनी लक्ष वेधले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल