शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्रानं मागितले होते 7.5 कोटी, भगवंत मान यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 9:48 PM

1 जानेवारीला 2016 रोजी सकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या सात जवानांना हौतात्म्य आले होते.

पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्र सरकारने पंजाब सरकारकडे 7.5 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा खळबळजनक आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोदी सरकारवर केला आहे. पंजाब विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पठाणकोट हल्ल्याचा उल्लेख करत ही माहिती दिली.

मुंख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, मी आणि आम आदमी पक्षाचे नेते साधू सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, की आपण हे पैसे आम्हाला मिळणाऱ्या संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या (MPLAD) निधीतून कापून घ्या आणि या बदल्यात आम्हाला फक्त, पंजाब भारताचा भाग नाही, आम्ही लष्कर भाड्याने घेत आहोत, असे लिहून द्या. 

पठाणकोट एअरबेसवर हल्ल्या झाल्यानंतर, लष्कर नंतर पोहोचले, त्याआधी सरकारचे पत्र आले, की लष्कर पंजाबमध्ये पाठवण्यात आले आहे, यामुळे पंजाबला 7.5 कोटी रुपये द्यावे लागतील, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्त संस्थेने यासंदर्भातील मुख्यमंत्री मान यांच्या भाषणाचा तो भागही प्रसिद्ध केला आहे. 

1 जानेवारीला 2016 रोजी सकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या सात जवानांना हौतात्म्य आले होते. सुमारे 80 तास चाललेल्या चकमकीत लष्कराने चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर पठाणकोट हल्ल्याचा बदला घेत भारताने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. यात भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केली होती.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानAAPआपBJPभाजपाRajnath Singhराजनाथ सिंहTerror Attackदहशतवादी हल्ला