शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

युपीएच्या काळात विजय माल्ल्यांना वाचवलं गेलं, अरुण जेटलींचा आरोप

By admin | Published: March 10, 2016 12:03 PM

युपीएच्या काळात विजय मल्ल्यांना वाचवलं गेल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे

नवी दिल्ली, दि. १० - युपीएच्या काळात विजय मल्ल्यांना वाचवलं गेल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. विजय मल्ल्या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी गुरुवारी राज्यसभेत निवेदन दिलं त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. 
 
जेव्हा विजय मल्ल्या परदेशात पळून गेले तेव्हा युपीएची सत्ता होती. विजय मल्ल्याला 2004 मध्ये बँकींगची सुविधा दिली गेली. ललित मोदी जेव्हा परदेशात गेले तेव्हादेखील काँग्रेस सत्तेत होती असं सांगत जेटलींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती अरुण जेटली यांनी दिली आहे. 
 
काँग्रेसने अरुण जेटलींच्या आरोपाला उत्तर देत भाजपा सरकारने विजय मल्ल्याला पळून जाण्यास मदत केल्याचा प्रत्यारोप गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. विजय मल्ल्या यांना कोणी कर्ज दिलं हा प्रश्न नाही तर त्यांनी देश सोडून जाण्यास का दिलं ? हा प्रश्न आहे. त्यांना देश सोडून जाण्याची परवानगी का दिली ? हा प्रश्न जयराम रमेश यांनी विचारला. दरम्यान राहुल गांधी यांनी सरकार आम्हाला बोलू देत नसल्याचा आरोप केला आहे. विजय मल्ल्या प्रकरणावर जर त्यांनी आम्हाला बोलू दिलं तर आम्ही बोलू, पण आम्हाला बोलू देतील की नाही ? शंका आहे. पंतप्रधानांना अशा मुद्यांवर चर्चा केलेली आवडत नाही असं राहुल गांधी बोलले आहेत.