शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

"दुर्योधन, दु:शासन दुष्ट होते, पण त्यांनी आणीबाणी लादली नाही"; थरूर यांच्या पुस्तकाचा आधार घेत ठाकूर यांची फटकेबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 8:36 PM

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देत अनुराग ठाकूर म्हणाले, “रीलचे नेते बनू नका, खूप व्हायरल होते. रियल नेते बना, त्यासाठी सत्य बोलावे लागते. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि त्यांचे महाभारताचे ज्ञानही अपघाती आहे. राहुल गांधी यांनी कधी महाभारत वाचले तर सोडाच, पण पाहिलेही नसेल."

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत आज भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार अनुराग ठाकूर यांनीही भाग घेताल. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या महाभारतावरील वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी केली. यावेळी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला.

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देत अनुराग ठाकूर म्हणाले, “रीलचे नेते बनू नका, खूप व्हायरल होते. रियल नेते बना, त्यासाठी सत्य बोलावे लागते. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि त्यांचे महाभारताचे ज्ञानही अपघाती आहे. राहुल गांधी यांनी कधी महाभारत वाचले तर सोडाच, पण पाहिलेही नसेल. कदाचित त्यांचे भाषण अंकल सॅम अथवा अंकल सोरोस यांनी लिहून दिलेले असावे.”

शशी थरूर यांच्या पुस्तकाचा उल्लेख -भाजप खासदार म्हणाले, “मी महाभारतावरील एक नवीन पुस्तक वाचले. ते पुस्तक त्यांच्याच पक्षाचे खासदार (शशी थरूर) यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन नोबेल'. राहुल गांधी यांना महाभारत आणि चक्रव्यूहची संपूर्ण माहिती हवी असेल, तर ते त्यांच्याशी संपर्क सादू शकतात. या कादंबरीत कोणत्या नेत्याला धृतराष्ट्र म्हटले आहे? कोणत्या पक्षाला कौरव म्हटले आहे? आणि कोण दुर्योधन आहे? हे राहुल गांधींना समजल्यानंतर त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. हे लोक केवळ पुस्तके दाखवतात. पण वाचत नाहीत. ते संविधान हलवत होते, मी विचारलं किती पानं आहेत, तेही सांगता आले नाही.”

ते पुढे म्हणाले, “या पुस्तकानुसार, ज्या पक्षाचे सर्वेसर्वा आपण आहात, त्याच पक्षाला कौरव म्हणण्यात आले आहे. मी पान क्रमांक 245 कोट करतो. यात देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना धृतराष्ट्र म्हणण्यात आले आहे. यात पुढे आणीबाणीचीही चर्चा आहे. 

"दुर्योधन, दु:शासन दुष्ट असू शकतात पण इमरजेन्सी नाही लावली" -अनुराग ठाकूर यांनी आणीबाणीचा उल्लेख करत इंदिरा गांधी यांचे नाव घेतले. ते म्हणाले, “मी ज्यांच्या बद्दल बोलत आहे, त्या देसाच्या पंतप्रधान होत्या आणि एका नेत्याच्या आजी होत्या. अनुराग पुढे म्हणाले, दुर्योधन, दु:शासन दुष्ट असू शकतात पण त्यांनीही कधी आणीबाणी लावली नव्हती.”    

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndira Gandhiइंदिरा गांधी