शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

‘गरिबांच्या योजना प्रभावीपणे राबवा’

By admin | Published: August 28, 2016 12:37 AM

केंद्र सरकारच्या वतीने गरिबांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने गरिबांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केले. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व भाजपा प्रदेशाध्यक्षांची एक बैठक शनिवारी दिल्लीत झाली. बैठकीच्या उद्घाटन सत्रात शाह यांनी सांगितले की, सध्या भाजपा देशातील ५७ टक्के भूभागावर, तसेच ३७ टक्के लोकसंख्येवर राज्य करत आहे. मोदी सरकारकडून गरिबांसाठी सुमारे ८0 योजना राबविल्या जातात. त्यापैकी ६५ योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारांवर आहे. अशा परिस्थितीत भाजपाशासित राज्यांची या कल्याणकारी योजनांच्या यशात महत्त्वाची भूमिका आहे. मे २0१४ मध्ये केंद्रात भाजपाची सत्ता आली. त्यानंतर अशा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांनी राज्य शाखांच्या कोअर समितीची बैठक घेतली. या बैठकीत ‘गरिबांचे हित आणि सुशासन’ या विषयीचा अजेंडा ठेवण्यात आला. सध्या भाजपा दलित आणि अल्पसंख्याक समुदायावरील अत्याचाराच्या घटनांमुळे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे. अशा कठीण प्रसंगी कल्याणकारी योजना आणि गरिबांवर विशेष लक्ष दिल्यास राजकीय संकटातून वाचता येऊ शकेल, असे भाजपात मानले जात आहे. शाह यांनी सांगितले की, भाजपाने देशात कामकाजाच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. भाजपाची राज्यांतील सरकारे केवळ आपल्या चांगल्या कामाच्या बळावर वारंवार निवडून आली आहेत. गरिबांसाठी कल्याणकारी राज्य बनविणे आणि सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणे, ही केंद्र आणि राज्य सरकारांची संयुक्त जबाबदारी आहे. (लोकमत न्यूज नेटकवर्क)वसुंधरा राजे गैरहजरया महत्त्वाच्या बैठकीला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे मात्र गैरहजर राहिल्या. त्यांनी स्वत: येण्याऐवजी ज्येष्ठ मंत्र्यांना बैठकीला पाठविले होते. भाजपाशासित मुख्यमंत्र्यांची ही पहिली बैठक होती.