शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

UP Election 2017 - निकालाचं गणित सुटता सुटेना, ही आहेत मुख्य कारणे

By admin | Published: March 08, 2017 3:04 PM

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे नेमके कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज बांधणं कठीण जात आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 8 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे नेमके कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज बांधणं कठीण जात आहे. अनेक राजकीय तज्ञांकडे याचं उत्तर नसून यावेळी कोणता पक्ष बाजी मारेल काही सांगता येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2007 आणि 2012 च्या निवडणुकीत मतदान पुर्ण होण्याआधीच काय निकाल असेल याचा अंदाज लावण्यात आला होता, मात्र यावेळी हे अंदाज सपशेल खोटे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2007 मध्ये मायावतींनी जोरदार मुसंडी घेत निवडणूक जिंकली होती, तर दुसरीकडे 2012 मध्ये अखिलेश यादव यांची सायकल विजयी मार्गावर घेऊन गेली होती. 
 
मात्र यावेळी निवडणुकीच्या निकालाचं भाकीत करणं कठीण असल्याची कारणे - 
 
1) 2007 आणि 2012 रोजी प्रादेशिक पक्ष समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षात थेट लढत असल्याने निकालाचा अंदाज लावणं सोप होतं. मात्र 2017 मध्ये दृश्य एकदम उलट असून राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात उलटफेर झाला आहे. ज्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावणं तितकं सोपं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. 
 
2) यावेळी मतदानाच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जातीवादाच्या नावाखाली भडकाऊ वक्तव्य करत मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी तो यशस्वी झाला असलेला दिसत नाही. भाजपाने अत्यंत आक्रमक पद्धतीने प्रचार केला असून यादव आणि मुस्लिमांनी त्यांना उत्तर दिलं नसलं तरी मतदान टक्केवारी वाढवत उत्तर दिलं आहे.
 
3) राष्ट्रीय पक्ष पुन्हा एकदा उत्तरप्रदेशच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करताना दिसत आहे. 2014 निवडणुकीत भाजपाने आपलं अस्तित्व सिद्ध केलं होतं. 2014 मध्ये असलेला भाजपाचा मतदानाचा टक्का 15 वरुन 42 टक्क्यांवर पोहोचला होता. 2007 मध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने 30.43 टक्के मतं मिळवत 403 जागांच्या विधानसभेतील 206 जागा जिंकल्या होत्या. याचप्रमाणे 2012 मध्ये अखिलेश यादव यांनी 224 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. 2017 मध्ये भाजपाचं तगडं आव्हान समोर असून सध्या मोदींचा करिश्मा सर्वच राज्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. भाजपा समोर असतानाही दोन्ही प्रादेशिक पक्ष भक्कम परिस्थितीत आहेत. राजकीय तज्ञांनुसार मायावतींना लोकांकडून छुपा पाठिंबा मिळत आहे. 
 
4) या निवडणुकीत महत्वाच्या पक्षांनी हातमिळवणी केली असून राजकारणातील नवी समीकरणं समोर आली आहेत. काँग्रेसने समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी फार कमी वेळा एकत्र येऊन प्रचार केला असला तरी अनेकांमध्ये याबद्दल कुतुहूल आहे. 2012 मधील मतदानाचा टक्का पाहिला तर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला मिळून 40 टक्के मतं होती.
 
5) महत्वाचे मुद्दे - 
- नोटाबंदीचा मुद्दा जरी उपस्थित करण्यात आला असला तरी त्याचा कोणत्याही पक्षावर परिणाम होईल असं वाटत नाही. 
- वादग्रस्त आणि भडकाऊ भाषणं करुनदेखील प्रचारात उतरण्यापासून त्यांना रोखण्यात आलं नाही. 
- अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव एक नेत्या म्हणून मैदानात उतरल्या आणि बैठका घेत कमान आपल्या हाती घेतली. 
- भाजपाने निवडणुकीत एकही भाजपा उमेदवार उतरवलेला नाही. तसंच मतदान केंद्रावर बुरखा घालून आलेल्या मतदारांची तपासणी करण्यासाठी महिलांना तैनात करण्यात यावं अशी मागणी केली आहे.
 
6) मोदींनी 2014 मध्ये तरुणांच्या रुपाने नवी व्होट बँक उभी केली आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव यांचादेखील शहरी आणि ग्रामीण भागात महत्वाचा वाटा असून त्याचं रुपांतर मतदानात होऊ शकतं. तसंच पत्नी डिंपल यांना प्रचारात उतरवून महिलांना आकर्षित करण्यात ते यशस्वी ठरलं आहेत. 
 
7) निवडणूक ही पक्षाकडून लढवली जात असली तरी त्याच्या प्रमुख नेत्याकडे पाहूनच मत दिलं जातं. त्याचप्रमाणे या निवडणुकीत मतदार कोणत्याही पक्षाला मत देत नसून नरेंद्र मोदी, अखिलेश यादव आणि मायावती यांना मतदान करत आहेत.  
निवडणुकीत निकाल काय येईल हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. काहीजण भाजपाला पुर्ण बहूमत मिळणार असल्याचं सांगत असे तरी या तिरंगी लढतीत समाजवादी पक्षाला दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही. काहीजण मायावती यादेखील निकालाचं रुपडं पालटतील असा अंदाज व्यक्त करत आहेत. आता नेमका काय निकाल लागतो ते 11 मार्चला कळेल, तोपर्यंत अंदाजच लावले जातील.