शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

UP Election 2017 : पाचव्या टप्प्याने वाढविली राजकीय पक्षांची चिंता

By admin | Published: March 02, 2017 4:57 AM

पाचव्या टप्प्यातील मतदान ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत

लखनौ : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत आणि अंदाज बांधण्याला सुरुवात झाली आहे.भाजपा, बसपा आणि काँग्रेस-सपा सर्वच पक्ष कमी मतदानाचा आपल्या संभाव्य कामगिरीवर अंदाज बांधत आहेत. पाचव्या टप्प्यात ११ जिल्ह्यांमधील ५१ जागांसाठी ५७.३६ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा नेते वरुण गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातील अमेठी आणि सुलतानपूर येथेही मतदानाची टक्केवारी कमीच राहिली. अमेठीत ५६.२५ टक्के आणि सुलतानपूर येथे ५६.३५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.या दोन जिल्ह्यांशिवाय सिद्धार्थनगर (५१.८२ टक्के), संत कबीरनगर (५२.३१ टक्के), बलरामपूर (५४.२५ टक्के) आणि गोनडा (५६.७३ टक्के) या सहा जिल्ह्यांमध्येही मतदान कमीच राहिले. आपलेच मतदार मोठ्या संख्येत मतदान केंद्रावर आले आणि विरोधकांचे मतदार फिरकलेच नाहीत, असा दावा प्रत्येक पक्ष करीत आहे.सपा आणि काँग्रेस हे दोघेही आपल्या परंपरागत मतदारांवर निर्भर आहेत तर बसपाला दलित मतदारांवर विश्वास आहे. भाजपा निश्चिंत आहे. ज्या भागांत कमी मतदान झाले तो भाग मुस्लीमबहुल असल्याने आपल्याला चिंता नाही, असे भाजपा नेते सांगत आहेत. (वृत्तसंस्था)