शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
2
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
3
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
4
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
5
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
6
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
7
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
8
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
9
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
10
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
11
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
12
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
13
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
14
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
15
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
16
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
17
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
18
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
19
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
20
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."

UP Election 2022: “मुस्लिम समाज आता आम्हाला मते देणार नाही, कारण आम्ही राम मंदिर बांधले, कलम ३७० हटवले”

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 10:02 AM

UP Election 2022: पाकिस्तान आणि दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांची मते पक्षाला नकोच, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

लखनऊ: पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींकडे देशाचे लक्ष लागेल आहे. सर्वाधिक नजरा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांवर (UP Election 2022) असणार आहेत. सर्व पक्षांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपला सत्ता राखणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे सर्वपक्षीय नेते वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. यातच आता भाजपच्या एका नेत्याने खळबळजनक विधान केले आहे. मुस्लिम समाज आता आम्हाला मते देणार नाही. कारण आम्ही राम मंदिर बांधले आणि अनुच्छेद ३७० हटवले, असा दावा करण्यात आला आहे. 

कन्नौज येथे एका जनसभेला संबोधित करताना भाजप खासदार सुब्रत पाठक यांनी मुस्लिम समाजाबाबत सदर विधान केले आहे. राम मंदिरांसारख्या मुद्द्यामुळे भाजपला मुस्लिम बांधवांची मते मिळणार नाहीत, असे पाठक म्हणाले. आम्ही १०० घरे बांधली तर, त्यातील ३० घरे मुस्लिम बांधवांचीही असतील. मात्र, असे असूनही आम्हाला मते देणार नाहीत. कारण चांगल्या गोष्टी केल्यात ते विसरून केवळ कलम ३७० रद्द केल्याचे लक्षात ठेवले जाते. याच कारणासाठी मते देणार नाही, असा दावा पाठक यांनी केला. 

दहशतवादाला समर्थन करणाऱ्यांची मते नकोच

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर बांधले जात आहे, काशी-विश्वनाथ कॉरिडोरचेही लोकार्पण करण्यात आले. आता मथुराची वेळ आली आहे. ज्यांना मते द्यायची आहेत, ते देतील. मात्र, भाजपला दहशतवादाचे समर्थन करणारे, पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणारे तसेच भारतात शरिया कायदा लागू करण्याची दिवास्वप्ने पाहणाऱ्यांची मते नकोच आहेत, असे पाठक यांनी ठामपणे सांगितले. 

दरम्यान, भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखेल असा अंदाज आहे. टाईम्स नाऊ आणि पोलस्ट्रेटच्या ओपिनियन पोलनुसार, पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल. भाजपला ४०३ पैकी २३९ ते २४५ जागा मिळू शकतील, असे सर्वेक्षण सांगते. तर समाजवादी पक्षाला ११९ ते १२५ जागा मिळतील असा अंदाज आहे. बहुजन समाज पक्ष ३० जागांसह तिसऱ्या, तर काँग्रेस ५ ते ८ जागांसह चौथ्या क्रमांकावर असेल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ