शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

बिहारचा निवडणूक आखाडाही तापला

By admin | Published: July 07, 2015 11:23 PM

केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करणारी जनगणनेची माहिती जारी केली असली तरी जातनिहाय आकडेवारी रोखून ठेवल्याने बिहारमधील प्रचारादरम्यान नवा वाद उफाळला आहे.

पाटणा : केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करणारी जनगणनेची माहिती जारी केली असली तरी जातनिहाय आकडेवारी रोखून ठेवल्याने बिहारमधील प्रचारादरम्यान नवा वाद उफाळला आहे. जातनिहाय आणि अल्पसंख्याकांच्या संख्येसंबंधी आकडेवारी दडवून ठेवत सरकारने कट रचल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चानेही (एचएएम) या मागणीत सूर मिसळत रालोआची अडचण वाढविली आहे.‘मार्च’ नेण्याचा इशारा केंद्र सरकारने जातनिहाय आकडेवारी जारी न केल्यास १३ जुलै रोजी पाटण्यातील राजभवनावर मार्च नेण्याचा इशारा लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे. आपल्या जातीची लोकसंख्या किती हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही जातींसंबंधी वेगवेगळे दावे ऐकले आहेत. या जनगणनेतून नेमकी संख्या समोर येईल, असे ते दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. जनतेच्या मागणीनुसार ही आकडेवारी जारी करायला हवी. केंद्र सरकार ही आकडेवारी जारी का करीत नाही, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे, असे नितीशकुमार यांनी सोमवारी म्हटले. (वृत्तसंस्था) एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न -भाजप४जातनिहाय आकडेवारी जारी करण्याची मागणी करीत राजद आणि जेडीयूने समाजातील सलोखा बिघडविण्याचे काम चालविले आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव यांनी केला. ४पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकासाकडे नेण्याची भाषा करीत असताना काही लोक जातीय राजकारणात तेल ओतत सामाजिक एकोपा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.