शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

७ टप्प्यांत मतदानाचा मोदींना फायदा? विरोधकांच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 5:19 PM

Election Commission: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 

निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन १८ व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 'चुनाव का पर्व, देश का गर्व' या घोषवाक्यासह यंदा लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम पार पडत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून ९७.८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. याआधीही २०१४ आणि २०१९ मध्ये सात टप्प्यांत मतदान झाले होते. 

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तारखा जाहीर करण्याआधी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. कोणत्या वयोगटातील किती मतदार, तृतीयपंथी मतदारांची संख्या, ज्येष्ठ नागरिक आणि १०० हून अधिक वय असलेल्या मतदारांची आकडेवारी सांगितली. तसेच त्यांनी निवडणुकीच्या काळात हिंसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधिंनी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना काही प्रश्न केले. ७ टप्प्यांत होत असलेल्या मतदानाचा सत्ताधारी पक्षाला फायदा होतो या विरोधकांच्या आरोपावर बोलताना राजीव कुमार म्हणाले की, भौगोलिक परिस्थिती, सण, परीक्षा आणि इतर घटक लक्षात घेऊन ७ टप्पे आवश्यक आहेत असे निदर्शनास आले. त्यामुळे सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. 

दरम्यान, महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.

महाराष्ट्रात कधी आणि कुठे मतदान?

  1. पहिला टप्पा- १९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
  2. दुसरा टप्पा-२६ एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी
  3. तिसरा टप्पा- ७ मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले
  4. चौथा टप्पा- १३ मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
  5. पाचवा टप्पा- २० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस