शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचे चर्चेचे निमंत्रण; मतदारयादीतील कथित घोळाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 06:55 IST

एकसारखे मतदार ओळखपत्र क्रमांक असल्याचा मुद्दा संसदेतही गाजला

नवी दिल्ली : मतदार यादीतील कथित गोंधळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांकडून निवडणूक नोंदणी, अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या पातळीवर कोणत्याही अडचणीच्या मुद्द्यांवर ३० एप्रिलपर्यत राजकीय पक्षांकडून मते मागवली आहेत.

चर्चा करण्याचा सल्ला 

विविध राजकीय पक्षांना मंगळवारी पाठवलेल्या वेगवेगळ्या पत्रांत पक्षाध्यक्षांसह ज्येष्ठ सदस्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.

आयोगाने दिल्या होत्या सूचना

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या आठवड्यात आयोगाच्या वतीने आयोजित एका संमेलनात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांशी नियमित चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यातून कायदेशीर मार्गाने तोडगा शोधून ३१ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते.

राहुल गांधी यांची मागणी 

एकसारखे मतदार ओळखपत्र क्रमांक असल्याचा मुद्दा संसदेतही गाजला होता. यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही संसदेत चर्चा करावी, अशी मागणी केली होती. याशिवाय इतर अनेक राजकीय पक्षांनी मतदारयाद्यांबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधी