शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 22:02 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी किमान उत्पन्न योजना जाहीर करत निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. मात्र, यावर नीती आयोगाने केलेल्या टीकेविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर आयोगाने नीती आयोगाला नोटीस पाठविली आहे. तर राहुल गांधी यांनी ही न्याय योजना जनतेचा आवाज असून सत्तेत आल्यानंतर नीती आयोगावाच टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले. यामध्ये रोजगाराभिमुख, शेती संकट दूर करण्यासाठी तसेच आरोग्य, शिक्षणासह अर्थव्यवस्था मजबूत करण्यासंबंधी घोषणा असणार असल्याचे सांगितले. तसेच न्याय योजनेवर टीका करणाऱ्या नीती आयोगालाही सत्तेत आल्यास बंद करणार असल्याचे ते म्हणाले.

तर दुसरीकडे काँग्रेसवर टीका करणाऱ्या नीती आयोगाच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली असून राजीव कुमार यांनी देशाबाहेर असल्याने यासाठी 5 एप्रिलपर्यंतचा वेळ मागितला आहे. 

राहुल गांधी हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी उद्योजकांना कर दहशतवादातूनही मुक्त करणार असल्याचे सांगितले. 

राहुल गांधी यांनी ट्विट करत सत्तेत आल्यानंतर नीती आयोगाला बंद करण्यात येईल. या बदल्यात योजना आयोगाला आणण्यात येईल, ज्यामध्ये प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, विशेषज्ञ असतील. यांची संख्या 100 पेक्षा कमी असेल. नीती आयोगाकडे कोणतेही काम नाही. यामुळे ते सरकारच्या प्रचारासाठी खोटी आकडेवारी देत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना आयोग बंद करून नीती आयोग सुरु केला होता. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक