शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

पीएम मोदींवरील टीका भोवणार? निवडणूक आयोगाने राहुल गांधींना पाठवली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 5:48 PM

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरुन टीका करताना राहुल गांधी म्हणाले, भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, पण पनौतीमुळे त्यांना हरवले, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर केली. यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान, आता हे टीका राहुल गांधींना भोवणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटीस पाठवली आहे. 

देशात पाच राज्यांच्या निवडणुका, पण नेदरलँडच्या निकालाचीच चर्चा; कट्टर नेत्याची सत्ता

निवडणूक आयोगाने २५ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्याकडून उत्तरे मागवली आहेत. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल  कारवाईची मागणी केली होती.

वागणुकीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करून निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आदेश पारित केला पाहिजे. अन्यथा निवडणुकीचे वातावरण बिघडेल आणि एखाद्या सन्माननीय व्यक्तीची बदनामी करण्यासाठी असभ्य, आक्षेपार्ह भाषा आणि बनावट बातम्यांचा वापर थांबवणे कठीण होईल, असंही यात म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी माफी मागावी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेले अपमानास्पद विधान अत्यंत अस्वीकार्य असून त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे पोहोचलेल्या शिष्टमंडळात भाजपचे मुख्यमंत्री राधामोहन दास अग्रवाल, ओम पाठक आणि इतर नेत्यांचा समावेश होता. भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात लज्जास्पद वक्तव्य करून त्यांचे खरे रूप दाखवले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग