शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पीएम मोदींवरील टीका भोवणार? निवडणूक आयोगाने राहुल गांधींना पाठवली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 17:49 IST

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरुन टीका करताना राहुल गांधी म्हणाले, भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, पण पनौतीमुळे त्यांना हरवले, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर केली. यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान, आता हे टीका राहुल गांधींना भोवणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटीस पाठवली आहे. 

देशात पाच राज्यांच्या निवडणुका, पण नेदरलँडच्या निकालाचीच चर्चा; कट्टर नेत्याची सत्ता

निवडणूक आयोगाने २५ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्याकडून उत्तरे मागवली आहेत. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल  कारवाईची मागणी केली होती.

वागणुकीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करून निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आदेश पारित केला पाहिजे. अन्यथा निवडणुकीचे वातावरण बिघडेल आणि एखाद्या सन्माननीय व्यक्तीची बदनामी करण्यासाठी असभ्य, आक्षेपार्ह भाषा आणि बनावट बातम्यांचा वापर थांबवणे कठीण होईल, असंही यात म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी माफी मागावी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेले अपमानास्पद विधान अत्यंत अस्वीकार्य असून त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे पोहोचलेल्या शिष्टमंडळात भाजपचे मुख्यमंत्री राधामोहन दास अग्रवाल, ओम पाठक आणि इतर नेत्यांचा समावेश होता. भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात लज्जास्पद वक्तव्य करून त्यांचे खरे रूप दाखवले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग