शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 2:48 PM

Election Commissioner Rajiv Kumar PC News: सुरत, इंदूर लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली, याबाबत आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली.

Election Commissioner Rajiv Kumar PC News: लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून इंडिया आघाडी आणि एनडीएचे नेते अनेक दावे-प्रतिदावे करत आहेत. निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. 

आपण मतदानाचा विश्वविक्रम केला आहे. महिला मतदारांची संख्या महत्त्वाची होती. येत्या काळात तरुण या मतदानातून प्रेरणा घेतील. ६४ कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले. ३१ कोटींहून अधिक महिला मतदारांनी मतदान केले. मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत बळकट आहे. निवडणूक उत्साहात पार पडली आहे. आता आम्ही पारदर्शीपणे मतमोजणीला आणि निकालाच्या दिवसाला सामोरे जात आहोत. कुणाकडून काहीही चुकीचे करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही कुणाचीही गय करणार नाही. लोकशाहीची मूळे बळकट करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो, असे राजीव कुमार यांनी म्हटले आहे. 

सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार नोटामध्ये निवडणूक का नाही

सुरत आणि इंदूर लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वच उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यानंतर त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे त्या ठिकाणी नोटा आणि उमेदवार यांच्यात लढत झाली पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त करण्यात आली होती. यासंदर्भात पत्रकार परिषदेत आयुक्त राजीव कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, आमची धारणा आहे की, सर्वच ठिकाणी मतदान झाले पाहिजे. परंतु निवडणुकीदरम्यान उमदेवार आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत असेल तर आम्ही काय करु शकतो? उमेदवारांनी स्वेच्छेने माघार घेतल्यामुळे आम्ही काहीच करु शकत नाही. परंतु उमेदवारावर कोणाचा दबाब असेल तर आम्ही काही भूमिका घेऊ शकतो, असे राजीव कुमार म्हणाले.

दरम्यान, इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या 'लापता जेंटलमैन वापस आ गए' मीम्सवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो, असे उत्तर राजीव कुमार यांनी विरोधकांना दिले आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात निवडणुका झाल्याचेही आयोगाने मान्य केले. पुढील लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपविण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग