शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

निवडणूक आयुक्तांचा राजकीय नेत्यांना शायरीतून टोला; सभागृहात पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 4:57 PM

निवडणूक आयुक्तांनी शायराना अंदाज दाखवला. यावेळी, सभागृहातील पत्रकारांमध्येही हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. 

नवी दिल्ली - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची म्हणजेच लोकसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. देशातील १८ व्या लोकसभा निवडणुकांसाठी आज मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती देत पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. यावेळी, शेरो-शायरीतून त्यांनी अनेकांना टोला लगावला, तर मतदारांना मतदानाला आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहनही केलं. यावेळी, राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही निवडणूक आयुक्तांनी मोलाचा सल्ला दिला असून वैयक्तिक टीका टीपण्णी करण्यापासून स्वत:ला रोखलं पाहिजे, असे म्हणत शायराना अंदाज दाखवला. यावेळी, सभागृहातील पत्रकारांमध्येही हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. 

देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. नुकतेच, निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासमवेत लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर, आज राजीव कुमार यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, ही निवडणूक ७ टप्प्यात होत असून २८ मार्च रोजी पहिलं नोटीफिकेश जारी होणार आहे. तर, १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर, देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.

निवडणूक आयुक्तांनी निवडणूक प्रकियेवर भाष्य करताना सर्वोतोपरी माहिती दिली. निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणुका होणार असून तब्बल ९७.८ कोटी मतदार या निवडणुकांसाठी मतदान करतील, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी, निवडणूक प्रकियेत असलेल्या आव्हानांवरही त्यांनी भाष्य केलं. तर, मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन करत, राजकीय पक्षांनाही शायरीतून टोला लगावला. राजकीय पक्षांनी वैयक्तिक टीका-टीपण्णीपासून दूर राहायला हवं, असा सल्ला राजीव कुमार यांनी दिला. यावेळी, त्यांनी, बशीर बद्र यांचा एक शेरही ऐकवला. 

दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों.

अशी शायरी निवडणूक आयुक्तांनी केली, त्यावर सभागृहातील पत्रकारांना टाळ्या वाजवून दाद दिली. त्यानंतर, आजकाल राजकारणात दोस्ती आणि दुश्मनी दोन्ही लवकर लववकरच होत असल्याचं राजीव कुमार यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकल्याचं दिसून आलं. दरम्यान, महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकारण गेल्या ५ वर्षात अशारितीनेच झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच, आयुक्तांनी कुठल्याही पक्षाचं नाव न घेता सर्वांनाच चिमटा काढला. 

दरम्यान, राजकीय नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर निवडणूक आयोगाचं लक्ष असणा आहे. त्यावरुन, अश्लाघ्य भाषेचा वापर करण्यात आला असेल तर त्या पोस्ट हटविण्यात येतील. तसेच, टीका टीपण्णी करताना मर्यादा ओलांडली किंवा चुकीच्या बातम्या, खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केल्यास आयोगाकडून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारणVotingमतदान