शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
2
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
3
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
4
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
5
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
6
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
7
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
8
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
9
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
10
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
11
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
12
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात
13
IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 
14
“स्वाभिमानाने लढलो, उद्धव ठाकरेंनी केले ते करायची हिंमत आहे का?”; राऊतांचा शिंदेंना टोला
15
मनू भाकरने 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी लिहिला खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली...
16
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
17
Atishi Marlena : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे
18
OTTनंतर जुनैद खान झळकणार रुपेरी पडद्यावर, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस
19
स्कार्पिओतून येऊ लागला धूर; बोनेट उघडताच बसला धक्का, आतून निघाला महाकाय अजगर
20
NTPC Green Energy लवकरच IPO साठी अर्ज करणार, १०००० कोटी रुपयांची असू शकतो आयपीओ

गावागावात पोहोचली वीज, हाती पैसा लागला खुळखुळू; मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 6:36 AM

२,००० लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांमध्ये विद्युतीकरणानंतर लक्षणीय आर्थिक वाढ नोंदवली गेली.

नवी दिल्ली - भारताच्या विद्युतीकरण कार्यक्रमामुळे विजेच्या उपलब्धतेत लक्षणीय वाढ झाली आहे. याअंतर्गत  विजेपासून वंचित असलेल्या १३ छोट्या गावांपैकी एक आणि सात ग्रामीण कुटुंबाला वीज जोडणी मिळाली आहे. या कार्यक्रमामुळे विद्युत दिवे आणि पंखे यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, मात्र अधिक महाग उपकरणे घेण्यात वाढ झाली नाही.

राजीव गांधी ग्राम विद्युतीकरण योजना, २००५ मध्ये सुरू करण्यात आली, यात चार लाखांहून अधिक गावांना वीज पुरवण्याचे उद्दिष्ट होते. ‘जर्नल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’त प्रकाशित अभ्यासानुसार, लहान गावांमध्ये विजेची उपलब्धता वाढली, मात्र, याचा आर्थिक परिणाम गावाच्या आकारानुसार बदलत राहिला. 

अभ्यासात काय?शिकागो विद्यापीठातील व मेरीलँड विद्यापीठातील संशोधकांनी यावर संशोधन केले. ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमामुळे विजेची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढली आहे, १३ पैकी एक लहान गाव (सुमारे ३०० रहिवासी) आणि सातपैकी एका ग्रामीण कुटुंबाला वीज मिळाली असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

नेमका परिणाम काय?३०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या खेड्यांमध्ये आर्थिक वाढ झाली नाही. २,००० लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांमध्ये विद्युतीकरणानंतर लक्षणीय आर्थिक वाढ नोंदवली गेली. या मोठ्या गावांमध्ये दरडोई मासिक खर्च जवळजवळ दुप्पट झाला असून, यात दरमहा १,४२८ रुपयांची वाढ झाली आहे.

टॅग्स :electricityवीज