शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

अयोध्येतील रामपथावरून विजेच्या दिव्यांची झाली चोरी? आरोप प्रत्यारोपांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 6:43 PM

Ayodhya News: अयोध्येतील राम पथावर लावण्यात आलेल्या विजेच्या दिव्यांची चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. रामपथावर दिवे लावण्याचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराने ५० लाख रुपयांहून अधिक किमतीचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असली तरी येथे चोरी होऊच शकत नाही असा दावा केला आहे 

या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येतील राम मंदिरामध्ये झालेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अयोध्या चर्चेत आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये अयोध्येतील राम मंदिरात झालेली पाण्याची गळती, रामपथावरील रस्त्याची झालेली दुरवस्था यावरूनही अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. दरम्यान आता, अयोध्येतील राम पथावर लावण्यात आलेल्या विजेच्या दिव्यांची चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. रामपथावर दिवे लावण्याचा ठेका मिळालेल्या ठेकेदाराने ५० लाख रुपयांहून अधिक किमतीचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असली तरी येथे चोरी होऊच शकत नाही असा दावा केला आहे 

याबाबत अयोध्येचे आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले की, ठेकेदाराने विजेचे दिवे चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजेचे दिवे चोरीस जाणं शक्य नाही. कारण अयोध्येमध्ये दिवसरात्र पोलिसांची गस्त असते. सुमारे ३६०० दिवे चोरीस गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र तरीही आम्ही या प्रकरणाचा तपास करणार आहोत.  

मात्र या आरोप प्रत्यारोपांमुळे आता अयोध्येतील रामपथावर लावण्यात येणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या कामात घोटाळा झाल्याच्या आरोपांना उधाण आलं आहे. ठेकेदाराने जे दिवे चोरीस गेल्याचा दावा केला आहे ते लावलेच गेले नाहीत असा दावा करण्यात येत आहे.  आता विजेचे दिवे चोरीस गेले की लावण्यातच आले नाहीत, हे आता तपासामधून समोर येणार आहे. मात्र जर हे विजेचे दिवे लावलेच गेले नसतील, तर तो उत्तर प्रदेशमधील मोठा घोटाळा ठरेल. कारण हे प्रकरण थेट रामलल्लांशी संबंधित आहे. एवढंच नाही तर रामललांवर श्रद्धा असलेल्या कोट्यवधी लोकांच्या भावनेशी निगडित आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश