शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

१५ पाक रेंजर्सचा खात्मा

By admin | Published: October 29, 2016 4:46 AM

पाकिस्तानी फौजांकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत होत असलेल्या हल्ल्याला तडाखेबाज उत्तर देत भारतीय सीमा सुरक्षा दलाने १५ पाकिस्तानी रेंसर्जचा खात्मा

जम्मू : पाकिस्तानी फौजांकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत होत असलेल्या हल्ल्याला तडाखेबाज उत्तर देत भारतीय सीमा सुरक्षा दलाने १५ पाकिस्तानी रेंसर्जचा खात्मा केला. पाकच्या काही चौक्याही उद्ध्वस्त केल्या. सीमेपलीकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटके पाहता पाकिस्तानी लष्कर या रेंजर्सना मदत करीत आहे, असा दावा बीएसएफने केला. सीमेपलीकडून पाकिस्तानच्या निमलष्करी सैनिकांनी जम्मूतील नियंत्रण रेषेलगतच्या भागात केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यासोबत केलेल्या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार, तर अन्य दोन जखमी झाले. गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफांसोबत गोळीबार करीत आंतरराष्ट्रीय सीमा, तसेच जम्मू, कथुआ, पूंछ व राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांसोबत नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. गेल्या २४ तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे १0 हून अधिक वेळा उल्लंघन केले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल हल्ला केल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेसह सीमावर्ती भागात लष्करासोबत सीमा सुरक्षा दल तसेच निमलष्करी दलासोबत प्रांतीय सुरक्षा दलांना सतर्क करीत पाकच्या कुरापतींना तोडीस तोड उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. (वृत्तसंस्था)जशास तसे उत्तर, पाकच्या काही चौक्या उद्ध्वस्त...- पाकिस्तानच्या बाजूने होणाऱ्या हल्ल्याला सीमा सुरक्षा दलाकडूनही ‘जशास तसे’ उत्तर दिले जात आहे. सीमा सुरक्षा दलाने केलेल्या उलट हल्ल्यात १५ पाक रेंजर्स ठार झाले असून, त्यांच्या काही चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत, असे सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महांसचालक अरुण कुमार यांनी सांगितले. - सीमेपलीकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले उखळी तोफगोळे (८० एमए आणि १२० एमएम) तसेच अन्य स्फोटकांनुसार पाकिस्तानी लष्कराची रेंजर्सला मदत असल्याचे उघड होते, असा दावाही त्यांनी केला.पलानवाला, मेंढरमध्ये दोन भारतीय नागरिक ठारपाकच्या तोफमाऱ्यात पलानवाल भागातील खौर पट्ट्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर आर. एस. पुरा भागात एक जखमी झाला. तसेच पूंछ जिल्ह्यातील मेंढर तालुक्यातील गोहलाद गावातील एक महिला ठार, तर अन्य एक जण जखमी झाल्याचे पोलीस आणि संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.खडा पहारा देत घुसखोरी उधळलीभारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान डोळ्यांत तेल घालून रात्रंदिवस खडा पहारा देत घुसखोरी उधळून लावण्यासोबत शस्त्रांनी चोख उत्तर देत आहेत. सीमा सुरक्षा दलाने गेल्या आठ दिवसांत कणखर पलटवार करून पाकिस्तानच्या १५ रेंजर्सचा खात्मा केला. गुरुवारी सायंकाळपासूनच पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू विभागातील कथुआमध्ये उखळी तोफा डागत गोळीबार सुरू केला. नंतर हिरानगर आणि सांबा भागालाही त्यांंनी लक्ष्य केले. शुक्रवारी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या २४ चौक्यांना लक्ष्य केले.३५ चौक्यांना केले लक्ष्य : गुरुवारी पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या ३५ चौक्यांना लक्ष्य केले होते. म्हणे, एकही जवान मेला नाही : १५ पाकिस्तानी रेंजर्सचा खात्मा झाला तरी, त्याचे पडसाद देशात उमटू नयेत, म्हणून पाकिस्तानने आमचा एकही सैनिक भारतीय गोळीबारात मरण पावला नाही, असा दावा केला आहे. दहशतवाद्यांची रानटी वृत्ती; शहीद जवानाचे अवयव कापलेकुपवाडा जिल्ह्यात मकहिल भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी रोखताना शहीद झालेल्या भारतीय जवानाचे अवयव कापून रानटी वृत्तीचे दहशतवादी पळून गेले. या घटनेला प्रत्युत्तर दिले जाईल, असेही सैन्य विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. पळून जाणाऱ्या दशतवाद्यांपैकी एक जण ठार झाला.