शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
2
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
3
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
4
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
5
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
8
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
9
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
10
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
11
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
12
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
13
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
14
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
15
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
16
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
17
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
18
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
19
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
20
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू

आणीबाणी काळा काळ; आठवणीने थरकाप उडतो - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 7:59 AM

पंतप्रधान म्हणाले की, देश जेव्हा स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे, तेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीच्या गुन्ह्याला समजून घेणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली : २५ जून विसरू शकत नाही, याच दिवशी आमच्यावर आणीबाणी लागू करण्यात आली होती. भारताच्या इतिहासातील हा काळा काळ होता. लाखो लोकांनी पूर्ण ताकदीनिशी आणीबाणीला विरोध केला. त्या काळात लोकशाहीच्या समर्थकांचा  ज्या प्रकारचा छळ झाला ते आठवले की आजही मनाचा थरकाप उडतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

‘मन की बात’च्या १०२ व्या भागात पंतप्रधान मोदींनी रविवारी जागतिक योग दिन, ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाची आपत्कालीन परिस्थिती, खेळ, २०२५ पर्यंत भारताला टीबीमुक्त करण्याची मोहीम आणि निसर्ग संवर्धन याबद्दल मते मांडली. चक्रीवादळात कच्छच्या लोकांनी दाखवलेल्या अभूतपूर्व धैर्याचे त्यांनी कौतुक केले.

मोदी म्हणाले की, भारत ही लोकशाहीची जननी आहे. आपण आपली राज्यघटना सर्वोपरी मानतो, म्हणून आपण २५ जूनला कधीही विसरू शकत नाही. तो काळा काळ होता.  याच दिवशी आपल्या देशात आणीबाणी लागू झाली होती.  लाखो लोकांनी याला पूर्ण ताकदीनिशी विरोध केला होता, असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान म्हणाले की, देश जेव्हा स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे, तेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीच्या गुन्ह्याला समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे आजच्या तरुण पिढीला लोकशाहीचा अर्थ आणि महत्त्व समजणे सोपे जाईल, असे ते म्हणाले.

छत्रपती शिवरायांचा उल्लेख...या महिन्याच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली. शिवाजी महाराजांच्या शौर्याशिवाय, त्यांच्या शासन आणि व्यवस्थापन कौशल्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापन आणि नौदलाबाबत केलेले कार्य आजही भारतीय इतिहासाची शान वाढवत आहे. त्यांनी बांधलेले किल्ले इतक्या शतकांनंतरही समुद्राच्या मधोमध अभिमानाने उभे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पाच दशकांनंतर  निळवंडे होतेय पूर्णपाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण होत आहे. काही दिवसांपूर्वी चाचणी दरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळची जी छायाचित्रे समोर आली ती खरच खूप भावूक करणारी होती. गावातील लोकं दिवाळी असल्यासारखी नाचत होती.    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी