शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

अच्छे दिन येणार? आठवड्यात ५ ऐवजी ४ दिवसच काम करावं लागणार? मोदी सरकार नियम बदलण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 07:56 IST

बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत बदल होणार; टेक होम सॅलरी घटणार

नवी दिल्ली: कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास आणि दिवस कमी होण्याची शक्यता आहे. नव्या लेबर कोडच्या नियमांमध्ये बदल करण्याची तयारी मोदी सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे लवकरच आठवड्यातून ५ ऐवजी ४ दिवसच काम करावं लागेल आणि २ दिवसांऐवजी ३ दिवस सुट्टी असेल. देशात येणाऱ्या नव्या कामगार कायद्यांच्या अंतर्गत येत्या काही दिवसांत आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळू शकेल.

नव्या लेबर कोड नियमांमध्ये आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी असा पर्याय ठेवला जाईल. यावर कंपनी आणि कर्मचारी सहमतीनं निर्णय घेऊ शकतात. कामाचे तास वाढवून ते १२ तासांपर्यंत नेण्याचा समावेश नव्या नियमांमध्ये करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार कर्मचारी आठवड्याला कमाल ४८ तास काम करेल. त्यामुळे अशा परिस्थितीत कामाचे तास कमी होऊ शकतात. 'मनीकंट्रोल'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.एका दगडात दोन पक्षी! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा

कामाचे तास १२ करण्याचा प्रस्तावनव्या कायद्याच्या मसुद्यात कामाचे तास वाढवून १२ करण्याचा प्रस्ताव आहे. कर्मचाऱ्यानं १५ ते ३० मिनिटं अधिक काम केल्यास ही अतिरिक्त वेळ ३० मिनिटं मानून त्याचा ओव्हरटाईममध्ये समावेश करण्याचादेखील प्रस्ताव आहे. सध्या ३० मिनिटांपेक्षा कमी वेळ काम केल्यास तो ओव्हरटाईम मानला जात नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याकडून सलग ५ तास सलग काम करून घेऊ नये अशीही एक तरतूद नियमांच्या मसुद्यात आहे. कर्मचाऱ्यांना पाच तासांनी अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा लागेल.

वेतन कमी होणार, पीएफ वाढणारनव्या नियमांच्या मसुद्यानुसार, एकूण पगारात बेसिक पगाराचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक असायला हवा. त्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत बदल होईल. टेक होम सॅलरी कमी होईल आणि पीएफची रक्कम वाढेल. 

टॅग्स :Labourकामगार