शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

निष्काळजीपणाचा कळस! रेल्वेतून पडलेल्या व्यक्तीला लावला रिकामा ऑक्सिजन सिलिंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 17:14 IST

राधेश्याम गुप्ता असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो छतरपूर येथील रहिवासी आहे.

मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील बेरछा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे. बेरछा स्थानकावर प्राथमिक उपचार करून जखमीला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिथे मलम आणि बँडेज लावल्यानंतर त्याला सर्जिकल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने जखमी व्यक्तीला रिकाम्या सिलिंडरमधून ऑक्सिजन देण्यात आला. एवढंच नाही तर रुग्णालयातील कर्मचारी पल्स ऑक्सिमीटर आणि इंजेक्शन शोधत राहिले, मात्र ते सापडले नाहीत. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला.

राधेश्याम गुप्ता असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो छतरपूर येथील रहिवासी आहे. राधेश्याम गुप्ता हे उज्जैनहून महाकालाचे दर्शन घेऊन घरी परतत होता. सकाळी अकराच्या सुमारास ते भोपाळला जाण्यासाठी उज्जैनहून निघाला. छतरपूरला जायचं होतं. याच दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास राधेश्याम पाणी भरण्यासाठी बेरछा स्थानकावर उतरला. ट्रेन सुरु झाल्यावर डब्यात चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो चालत्या ट्रेनमधून खाली पडला. स्थानकावर प्राथमिक उपचारानंतर जखमी राधेश्यामला बेरछा येथून रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून वॉर्डात उपस्थित असलेल्या काही लोकांनी जखमीच्या बेडवर ऑक्सिजन सिलिंडर आणला, त्याची प्रकृती खराब होती. सिलिंडरमध्ये ऑक्सिजन नव्हता. त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाली. डॉक्टरांनी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर नवीन झाला यांना बोलावून घेतले. डॉक्टर सुमारे अर्धा तास उशिरा जखमी व्यक्तीपर्यंत पोहोचले. तोपर्यंत जखमी राधेश्यामचा मृत्यू झाला होता.

बेरछा स्थानकावरून मिळालेल्या माहितीनुसार, दाहोद-भोपाळ क्रमांक 19339 या ट्रेनने प्रवास करणारी व्यक्ती पाणी भरण्यासाठी स्टेशनवर उतरली होती. तो पाणी भरू लागला. इतक्यात ट्रेन पुढे जाऊ लागली. ती व्यक्ती त्याच्या कोचकडे धावली. ट्रेनचा वेग जरा जास्तच होता. त्याने चढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. डोक्याला, कानाला, पाठीला इ. दुखापत होऊन रक्त येत होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश