शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लॉकडाऊन संपताच शहरांमधील बेरोजगारीचा दर होऊ लागला कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:52 IST

सरकारची माहिती : यापूर्वी होते खासगी संस्थांचे सर्वेक्षण

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२०-२१च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर - डिसेंबर २०२० या कालावधीत शहरांतील बेरोजगारीचा दर आदल्या तिमाहीच्या तुलनेत घटून १०.३ टक्के झाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.एनएसओने दीर्घ काळापासून बेरोजगारीची आकडेवारी जारी केलेली नव्हती. या आकडेवारीसाठी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीसारख्या (सीएमआयई) खासगी संस्थांवर अवलंबून राहावे लागत होते. या अहवालासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या काळात अखिल भारतीय पातळीवर एकूण ५,५६३ यूएफएस ब्लॉकमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

एनएसओच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२०ला संपलेल्या तिमाहीत भारतातील बेरोजगारीचा दर १०.३ टक्के राहिला. त्याआधीच्या जुलै - सप्टेंबर २०२० या तिमाहीत तो १३.२ टक्के होता. आदल्या वर्षाच्या तुलनेत मात्र बेरोजगारीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर २०१९ला संपलेल्या तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर एकअंकी ७.८ टक्के होता. अहवालात म्हटले आहे की, डिसेंबर २०२०च्या तिमाहीत शहरांतील सर्व वयोगटातील लोकांचा श्रमशक्ती सहभागिता दर ३७.३ टक्के राहिला. आदल्या वर्षीच्या याच तिमाहीत तो ३७.२ टक्के होता. तसेच जुलै-सप्टेंबर २०२०च्या तिमाहीत तो ३७ टक्के होता. 

जून २०२०मध्ये सर्वाधिक बेरोजगारीएनएसओने केलेल्या सर्वेक्षणानुसार, वित्त वर्ष २०२० - २१च्या एप्रिल - जून तिमाहीत बेरोजगारी सर्वाधिक २०.८ टक्के होती. या काळात कोविड-१९ साथीमुळे देशभरात सक्तीचे लॉकडाऊन सुरू होते.

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार