शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
3
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
4
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
5
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
6
Suraj Chavan : "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
7
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
8
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
9
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
10
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
11
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
12
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
13
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
14
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
15
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
16
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
17
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
18
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
19
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
20
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

सम-विषम योजना दिल्लीत पुन्हा सुरू होणार

By admin | Published: January 17, 2016 2:05 AM

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीचे सरकार राजधानी दिल्लीत पुन्हा सम-विषम योजना सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करीत असून पुढील महिन्यात

- शीलेश शर्मा, नवी दिल्लीमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीचे सरकार राजधानी दिल्लीत पुन्हा सम-विषम योजना सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करीत असून पुढील महिन्यात यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ ते १५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात आलेल्या सम-विषम योजनेला दिल्लीकर आणि सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे केजरीवाल यांचा उत्साह वाढला आहे. या काळात प्रदूषणाचा स्तर भलेही कमी झाला नसेल पण दिल्लीच्या रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक जामपासून मात्र येथील लोकांचा मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेला मिळणाऱ्या भरघोस पाठिंब्यामागे हेच मुख्य कारण आहे. निम्म्यावर लोकांचा पाठिंबाताज्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील ५४ टक्के लोकांनी योजनेला पाठिंबा देताना त्याची प्रशंसा केली आहे. तर २१ टक्के नागरिकांनी सम-विषमला विरोध केला आहे. २५ टक्के लोकांनी कुठलेही मत व्यक्त केलेले नाही. दुसरीकडे प्रदूषणात झालेल्या घटाबद्दल वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. हिवाळा नसता तर या योजनेचे ठोस परिणाम समोर आले असते, असा दावा पर्यावरण विशेषज्ञ सुनीता नारायण यांनी केला होता तर प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढले असल्याचा युक्तिवाद अनेक संस्थांनी केला आहे. सम-विषय योजनेमुळे दिल्लीत पेट्रोल, डिझेलच्या वापराचे प्रमाण कमी झाले असल्याचे अन्य एका सर्वेक्षणात सांगण्यात आले. एका पेट्रोल पंपावर दररोज तीन टॅँकर विक्री होत होती. सम-विषममुळे ती दोन टँकरवर आली आहे. एका टँकरमध्ये २० हजार लिटर पेट्रोल असते आणि दिल्लीत हजारो पेट्रोल पंप आहेत. तेव्हा दररोज किती पेट्रोलची बचत होत असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. वाया जाणारअया इंधनाचे प्रमाणही कमी झाले आहे.