शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

ESIC News: केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देणार, ही योजना बंद होणार, असा परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 15:18 IST

ESIC News: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याची तयारी केंद्र सरकराने केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली. कोविड-१९ रिलिफ स्कीम मार्च महिन्यामध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली - सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याची तयारी केंद्र सरकराने केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली. कोविड-१९ रिलिफ स्कीम मार्च महिन्यामध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने ही योजना २४ मार्च २०२० रोजी दोन वर्षांसाठी सुरू केली होती. तेव्हापासून ही योजना सुरू आहे. तिला या मार्च महिन्यामध्ये दोन वर्षे पूर्ण होणार आहेत.

कर्मचारी राज्य विमा निगमच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक हल्लीच झाली होती. ईएसआयसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत कोविडबाबतच्या मदत योजना पुढे सुरू ठेवण्याची गरज नाही. या बैठकीमध्ये कामगारमंत्र्यांनी सांगितले की, ईएसआयसी रुग्णालयांकडून श्रमिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू राहील. तसेच फॅक्टरी-एमएसएमई क्लस्टरला एक युनिट मानले जाईल.

देशात कोरोनाचा फैलाव सुरू झालयावर ईएसआयसीअंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाटी ही योजना सुरू करण्यात आली होती. कुठल्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात होती. दरम्यान, ईएसआयसीशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या मते ही योजना अजून एक वर्ष सुरू राहावी, अशी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची माहिती होती. त्यांच्या मते कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. अजूनही देशात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मात्र कामगार मंत्र्यांनी कोरोनाचा धोका आता तितकासा राहिला नसल्याचे सांगत आरोग्य मंत्र्यांनी ही योजना पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला होता.  

टॅग्स :Employeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या