शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

शिष्टाचार सुविधा न्यायमूर्तींचा विशेषाधिकार नाही; सरन्यायाधीशांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 06:19 IST

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची नाराजी

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या सांगण्यावरून त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागण्यात आले होते. याचा संदर्भ घेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्व मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून आपली नाराजी आणि चिंता व्यक्त केली. न्यायमूर्तींसाठी उपलब्ध शिष्टाचार सुविधा अशा प्रकारे वापरल्या जाऊ नयेत, ज्यामुळे इतरांची गैरसोय होऊ शकते किंवा न्यायव्यवस्थेवर सार्वजनिक टीका होऊ शकते, यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपल्या पत्रात भर दिला.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निबंधक (शिष्टाचार) यांनी १४ जुलै रोजी उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांना न्यायमूर्तींना झालेल्या गैरसोयीबद्दल विचारणा केल्याचा संदर्भ देत, सरन्यायधीश म्हणाले की, यामुळे साहजिकच न्यायपालिकेत आणि बाहेर अस्वस्थता निर्माण झाली आहे.संबंधितांना ओशाळल्यासारखे वाटू नये म्हणून सरन्यायाधीशांनी पत्रात न्यायमूर्ती किंवा उच्च न्यायालयाच्या नावाचा उल्लेख नसला तरी, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना रेल्वे कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचे अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आपल्या वरिष्ठांना खूश ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्याला रेल्वे कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्याची गरज नाही, असेही सरन्यायाधीशांनी खडसावले आहे. 

‘न्यायमूर्तींना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शिष्टाचार सुविधांचा उपयोग विशेषाधिकाराचा दावा करण्यासाठी केला जाऊ नये, ज्यामुळे त्यांना समाजापासून वेगळे पाहिले जाईल किंवा त्यांच्या शक्ती-अधिकाराचे प्रदर्शन होईल. न्यायिक अधिकाराचा सुयोग्य वापर खंडपीठात असताना आणि बाहेर दोन्ही ठिकाणी न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता आणि वैधता आणि समाजाचा आपल्या न्यायमूर्तींवर असलेला विश्वास टिकवून ठेवतो,’ असे पत्रात म्हटले आहे.‘मी उच्च न्यायालयांच्या सर्व मुख्य न्यायमूर्तींना माझ्या चिंता उच्च न्यायालयातील सर्व सहकाऱ्यांशी शेअर करण्याची कळकळीची विनंती करत आहे. न्यायव्यवस्थेत आत्मचिंतन आणि समुपदेशन आवश्यक आहे,’ असे पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयrailwayरेल्वे