शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

"10 पक्ष एकत्र लढले असते तरी...!" दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांचं मोठं विधान, स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 01:36 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील I.N.D.I.A. सोबत निवडणूक लढणाऱ्या आपने दिल्लीतही आघाडी करून निवडणूक लढली असती, तर निकाल काही वेगळे आला असता, असे काही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आता काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी मोठे विधान केले आहे.

गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीत सत्तेवर असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला आहे. तर भाजपला मोठा विजय मिळाला आहे. मात्र याच वेळी, काँग्रेसला मात्र आपले खातेही उघडता आलेले नाही. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील I.N.D.I.A. सोबत निवडणूक लढणाऱ्या आपने दिल्लीतही आघाडी करून निवडणूक लढली असती, तर निकाल काही वेगळे आला असता, असे काही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आता काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी मोठे विधान केले आहे.

काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, दिल्लीतील जनतेने कुणालाही हरवले नाही. तर केजरीवाल यांना पदावरून दूर केले आहे. AAP-काँग्रेस आघाडीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, दिल्लीत 10 पक्ष जरी त्यांच्यासोबत असते, तरीही त्यांचा पराभव निश्चित होता. कारण दिल्लीने अरविंद केजरीवाल यांना सत्तेवरून हटवण्याचा निर्णय आधीच घेतलेला होता. 

काय म्हणाले संदीप दीक्षित? -काँग्रेस नेते दिक्षित म्हणाले, "दिल्लीतील जनतेने कुणालाही हरवलेले नाही. उलट त्यांनी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले आहे. जर आम्ही (आप आणि काँग्रेस) एकत्रितपणे निवडणूक लढवली असती, तर निकाल आणखी वाईट आले असते. दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांना हटवण्याचे निश्चित केले होते. त्यांच्या सोबत १० पक्ष असते तरीही ते हरलेच असते.

48 जागांवर भाजपचा विजय -दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले आणि ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत, भारतीय जनता पक्षाने ४८ जागा जिंकत प्रचंड विजय मिळवला. आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या, तर काँग्रेससह इतर पक्षांना खातेही उघडता आले नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Aam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपBJPभाजपा