शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नाराजीनंतरही भाजप देईना भाव, वरून गांधी काँग्रेसच्या मार्गावर जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 09:38 IST

वरुण गांधी आणि त्यांची आई मेनका गांधी यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे. यामुळेच त्यांचा हटविण्यात आल्याची चर्चा आहे. खरे तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मेनका गांधी यांना मंत्री करण्यात आले नाही. तेव्हापासूनच हा दुरावा दिसू लागला आहे.

नवी दिल्ली - भाजप खासदार वरुण गांधी (varun gandhi) आणि पक्षातील अंतर वाढताना दिसत आहे. कधी काळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहिलेल्या वरुण गांधींकडे गेल्या काही दिवसांपासून दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना ना पक्षात महत्वाची जागा मिळत आहे, ना केंद्र सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. आता लखीमपूर खेरी प्रकरणाबरोबरच, भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निर्मिती तर वरुण यांच्या नाराजीचे कारण नाही? अशी चर्चा राकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि मेनका गांधी दोघांनाही स्थान मिळालेले नाही. यापूर्वी हे दोन्ही नेते यात होते. असेही नवी कार्यकारिणी तयार करताना 25 ते 30 टक्के सदस्य बदले जातातच आणि यावेळीही भाजपने अनेक मुख्य चेहरे बदलले आहेत.

वरुण गांधी आणि त्यांची आई मेनका गांधी यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे. यामुळेच त्यांचा हटविण्यात आल्याची चर्चा आहे. खरे तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मेनका गांधी यांना मंत्री करण्यात आले नाही. तेव्हापासूनच हा दुरावा दिसू लागला आहे. वरुण गांधीही संघटनेच्या कामातही अधिक रस घेत नव्हते. एवढेच नाही, तर नुकतेच आपण कार्यकारिणीमध्ये होतो, की नाही हेही आपल्याला माहीत नाही, हे त्यांचे वक्तव्यही चर्चेचा विषय बनले होते.

आता उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जवळ आली असतानाच, वरून गांधी यांची विधाने भाजपला अस्वस्थ करणारी आहेत. मात्र, असे असले तरी भाजपही वरूण गांधी यांच्या वक्तव्यांना फारशी किंमत देताना दिसत नाही. त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावर प्रतिक्रियाही दिली जात नाही. यावरून स्पष्ट आहे, की भाजप वरून गांधी यांना फारसे गांभीर्याने घेत नाही.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीManeka Gandhiमनेका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस