शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

जीव गेले तरीही गर्दी हटेना, जास्त गर्दीमुळे परिस्थिती हाताळणे अधिकाऱ्यांना जमेना; भाविकांचा ओघ थांबता थांबेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 09:18 IST

या अव्यवस्थेची जबाबदारी अखेर कुणाची?

नवी दिल्ली : शनिवारी रात्री दिल्ली स्टेशनवर शेकडो भाविक प्रयागराज रेल्वेची वाट पाहत उभे असताना गाडीचा फलाट बदलल्याच्या उद्घोषणेमुळे घात झाला आणि पळापळीत १८ जणांचे जीव गेले. फलाट बदलाचे कारण जीवघेणे ठरले आहे.

चेंगराचेंगरीच्या एका दिवसानंतर, हजारो प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. योग्य नियोजन नसल्याने महाकुंभला जाणारे भाविक स्टेशनवर ताटकळत उभे होते. अतिरिक्त उपाय करूनही भाविकांचा ओघ सुरूच आहे. त्यापैकी बहुतेक महाकुंभ यात्रेकरू प्रयागराजला जात आहेत. जास्त गर्दीमुळे परिस्थिती हाताळणे अधिकाऱ्यांना कठीण झाले आहे.

फाटलेल्या बॅगांचे साक्षीदार

फलाट १४ आणि १५ एका भयंकर घटनेचे साक्षीदार ठरले. या फलाटांवर विखुरलेल्या चपला-बूट, फाटलेल्या बॅगा, खाण्याचे पदार्थ यांचा खच पाहणाऱ्यांचे मन हेलावून गेले होते. हे साहित्य रविवारी सकाळपर्यंत कर्मचाऱ्यांनी हलवले, परंतु या घटनेने प्रत्येकाच्या मनात कोरलेल्या भयंकर खुणा कधीच न मिटणाऱ्या ठरल्या.

पत्नी, मुलगी ठार, पण...

राजकुमार मांझीने त्याच्यावर कोसळलेल्या दु:खाची आपबीती सांगितली. राजकुमारची पत्नी आणि मुलगी या चेंगराचेंगरीत मारली गेली. मुलगा वाचला खरा, परंतु तो रविवारी उशिरापर्यंत सापडला नव्हता.

लोकांचा गेल्या २९ जानेवारीला मौनी अमावस्येदिवशी महाकुंभच्या संगम भागात चेंगराचेंगरीत  मृत्यू, ६० जखमी. गेल्या वर्षी जुलैमध्ये उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये स्वयंभू भोलेबाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

ताशी १५०० तिकिटे

एकिकडे विलंबाने धावणाऱ्या रेल्वे आणि दुसरीकडे सामान्य श्रेणीतील डब्यांसाठी ताशी १५०० तिकिटांची विक्री, यामुळे दिल्ली स्टेशनवर गर्दी वाढत राहिली. आता चुकले कुठे याचा अधिकारी शोध घेत आहेत.

इकडे राजकारण तापले

राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते : प्रयागराजकडे जाणाऱ्यांची संख्या पाहता योग्य नियोजन करायला हवे होते. या घटनेने पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता दिसून आली.

मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस अध्यक्ष : चेंगराचेंगरीची घटना रेल्वे विभागाचे अपयश आणि सरकारच्या असंवेदनशीलतेची साक्ष आहे. सरकार सत्य दडवू पाहत आहे.

लालुप्रसाद यादव, राजद प्रमुख : दिल्ली स्टेशनवरील घटनेला सर्वस्वी रेल्वे विभागच जबाबदार आहे.

अखिलेश यादव, सपा प्रमुख : सुनियोजित व्यवस्थेच्या अभावामुळे अशा दुर्घटना होत आहेत.

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीrailwayरेल्वे