शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

६ गोळ्या लागल्या, तरी जिवंत राहणार जवान; भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 06:15 IST

सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटचे वजन जास्त आहे. यामुळे गंभीर मोहिमांच्या वेळी सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे. त्यात सहा गोळ्यांनी भेद केला तरी जवानाचे रक्षण करण्यास ते सक्षम आहे. 

डीआरडीओच्या या यशाची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट हे पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटचे बनलेले आहे. या जॅकेटमध्ये ६ गोळ्याही (स्नायपर बुलेट) घुसू शकल्या नाहीत. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे जॅकेट गोळ्या, दारुगोळापासून संरक्षण देईल. कानपूर येथील डीआरडीओच्या ‘डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ने (डीएमएसआरडीई) हे जॅकेट तयार केले आहे. या जॅकेटची टीबीआरएल चंडीगड येथे चाचणी घेण्यात आली.

सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटचे वजन जास्त आहे. यामुळे गंभीर मोहिमांच्या वेळी सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो. आता त्यांना यातून दिलासा मिळू शकतो, असे मंत्रालयाने म्हटले.

‘युद्धासाठी आम्ही मागे राहणार नाही’भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे नवी दिल्लीत ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (एआयएमए) नवव्या राष्ट्रीय नेतृत्व परिषदेत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या महत्त्वावर चर्चा केली. अलीकडच्या भू-राजकीय घडामोडींनी हे दाखवून दिले आहे की, जिथे राष्ट्रीय हितसंबंध असतात, तिथे देश युद्ध करायला मागेपुढे पाहणार नाहीत. युद्धे रोखण्यासाठी तसेच हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आवश्यक असल्यास युद्ध जिंकण्यासाठी लष्करी शक्ती आवश्यक आहे, आम्ही युद्धासाठी मागेपुढे करणार नाही, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान