शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

प्रत्येक मुलाला बसणार उष्णतेच्या लाटेचा फटका; प्रचंड तापमानामुळे भविष्याला धोका, शेतीही संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 11:23 AM

आशियातील अनेक देशांमध्ये तापमानाचा नवा विक्रम होत असून, २०२३ हे वर्ष संपूर्ण जगासाठी सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची भीती आहे.

नवी दिल्ली : आशियातील अनेक देशांमध्ये तापमानाचा नवा विक्रम होत असून, २०२३ हे वर्ष संपूर्ण जगासाठी सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची भीती आहे. उत्तर गोलार्धातील वाढते तापमान हे एक मोठ्या संकटाची चाहूल असून, एल निनोमुळे तापमान अभूतपूर्व पातळीवर पोहोचत आहे. वाढत्या तापमानाचा आशियातील मोठ्या लोक संख्येवर परिणाम झाला आहे.

उष्णतेच्या प्रकोपामुळे शेतीवरील संकट वाढत आहे. मानवी हस्तक्षेपांमुळे हवामान संकट आणखी वाढले आहे. या संकटाचा परिणाम जसजसा तीव्र होत जाईल तसतसे उष्णतेच्या लाटा आणखी विध्वंसक होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

इम्रान खान यांना अटक का?, शिवसेनेचा कोणाला टोला; सांगितलं सुडाचं राज'कारण'

मुलांच्या शिक्षणावर परिणाम

फिलीपिन्समध्ये उष्मा निर्देशांक धोक्याची पातळीवर गेल्याने शाळेचे तास कमी करावे लागले आहेत. एप्रिलच्या मध्यात, थायलंडमध्ये तापमान ४४.६ अंशांवर  पोहोचले. बांगलादेशची राजधानी ढाका येथेही ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे १९६० नंतरचे सर्वाधिक तापमान आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, २०३० च्या दशकात तापमान १.५ अंश सेल्सिअस ओलांडण्याची भीती आहे.

तापमानाचे परिणाम...

२ अब्ज पेक्षा अधिक शहरी लोकांवर प्रचंड तापमानाचा परिणाम होत आहे.

२०५० पर्यंत जगातील जवळजवळ प्रत्येक मुलाला उष्णतेच्या लाटेचा फटका बसेल.

१९८० पासून तापमानाच्या एक्सपोजरमध्ये २०० टक्के वाढ .

मागील ८ वर्षे रेकॉर्डब्रेक तापमान वाढीची ठरली आहेत.

भारतावर काय परिणाम?

मार्च हा महिना आशियातील या वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. चीनमध्ये २०२२ मध्ये भयंकर तापमान आणि दुष्काळानंतर सुमारे एक वर्षांनी १०० हून अधिक हवामान केंद्रांनी गेल्या महिन्यात चीनमध्ये सर्वोच्च तापमान नोंदवले.

भारत आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये हवामानाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या वर्षांत अति उष्णतेच्या लाटा आणि वातावरणातील प्रचंड बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेसारख्याच या घटना असतील आणि त्याचा भारतीय उपखंडावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती आहे.